डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता

बाबासाहेब आंबेडकर ह्यांची ओळख घटनाकार, कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ अशी आहे. परंतु पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून अद्यापही त्यांची तेवढी दखल घेतली गेलेली नाही. आंबेडकरांनी पत्रकारिता पोटभरू किंवा प्रचारकी म्हणून केली नाही, तर समाजोद्धार हाच त्यांचा मुख्य हेतू होता. राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान त्यांना लाभलेले होते. ह्या बाबीकडे ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘प्रबुद्ध भारत’ ह्या नावांनी पाक्षिके चालवली. त्यांपैकी ‘जनता’ आणि ‘प्रबुद्ध भारत’ ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन त्यांनी स्वतः न करता सहकार्‍यांकडून करून घेतले.

पुढे वाचा

प्रा.स.ह.देशपांडे यांचे राष्ट्रवादविषयक विचार (पूर्वार्ध)

प्रा. स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष

दिनांक १७ डिसेंबर २०२३ पासून थोर राष्ट्रवादी विचारवंत प्रा. डॉ. स.ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. राष्ट्रवाद हा सहंच्या अभ्यासाचा आणि जीवनभरच्या चिंतनाचा विषय होता. मुळात ‘अर्थशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक असलेले स. ह. उत्तरायुष्यात ‘भारतीय राष्ट्रवादा’च्या तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आकंठ बुडाले. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे आपले तत्त्वज्ञान मांडताना, मुस्लिम समाजाची कडवी धर्मनिष्ठा राष्ट्रवादाच्या आड येते आणि याची बीजे त्यांच्या धर्मात आहेत, असे ते निःसंदिग्धपणे म्हणत असत. पण म्हणून हिंदूंनी कडवे धर्मनिष्ठ होणे, हा त्या समस्येवरचा उपाय नाही; हेही ते तितकेच ठासून सांगत.

पुढे वाचा

प्रा. स.ह.देशपांडे यांचे राष्ट्रवादविषयक विचार (उत्तरार्ध)

प्रा. स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष

पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे प्रा.स.ह. देशपांडे यांच्या ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व’ (आवृत्ती पहिली, १ जुलै २००२) या ग्रंथात त्यांनी विवेचिलेले त्यांचे राष्ट्रवादविषयक विचार आपण समजावून घेत आहोत.

राष्ट्रवादाची गरज व त्याचे स्वरूप 

.ह. म्हणतात, “राष्ट्रवादाचे मूळ गृहीतक असे की जग स्पर्धाशील आहे. टोळ्या म्हणून,जमाती म्हणून, वंश म्हणून किंवा वेगवेगळे धार्मिक समूह म्हणून मानवजात गटागटांत विभागली गेली आहे आणि हे गट कधी या रूपाने तर कधी त्या रूपाने एकमेकांशी स्पर्धा करीत आलेले आहेत. गेली काही शतके ‘राष्ट्र’ हा मानवगट या स्पर्धेतला एक महत्त्वाचा एकक (यूनिट) झालेला आहे.

पुढे वाचा

‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य आहे का?

‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य आहे का? ह्या कुटुंबाचा धर्म कोणता असेल? ह्या कुटुंबाचा देव कोण असेल?
‘Man is an animal that makes bargain’
देव, विश्व, आणि निसर्ग ही तिन्हीं एकाच गोष्टीची नावें आहेत.’बायबलमध्ये म्हटले आहे तसे, देव कुणी वेगळा नाही. असे जाहीरपणे प्रकट केल्याबद्दल, थॉमस आयकनहेड नावाच्या वीस वर्षे वयाच्या तरुणाला अठराव्या शतकात मृत्युदंड दिला होता. देवाच्या नावाने धर्म काय करू शकतो, त्याची ही झलक!

१.
धर्मांच्या उदयामुळे मनुष्याचे कल्याण साधले का? धर्माने मनुष्याला नीतिमान बनवले का? धर्माने मनुष्याला दैववादी केले का?

पुढे वाचा

नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या अमेरिकन निवडणुका

यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. तत्संबंधी काही माहिती आणि विचार:

विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन विरुद्ध माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प असा हा सामना आहे.

ज्या ट्रम्पनी निवडणूक हरल्यावर ६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या समर्थकांना ‘कॅपिटल हिल’वरील संसदभवनावर हल्ला करायला प्रोत्साहन दिले, ते हे ट्रम्प! त्यावेळी उपराष्ट्रपती पेन्स हे त्या संसदभवनात निवडणूक मतदानावर शिक्कामोर्तब करीत असताना भवनाबाहेर ट्रम्पचे बगलबच्चे पेन्सना चौकात फाशी देण्याची तयारी करीत होते. त्यांना चिथावणी देणारे तेच हे ट्रम्प!! ज्यांच्यावर अमेरिकेतील अनेक कोर्टातून खटले चालू असून नुकतेच न्यूयॉर्कमधील खटल्यात ज्युरीने एकमताने ज्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केले, तेपण हेच ट्रम्प!!!

पुढे वाचा

वैज्ञानिक अभ्यासपद्धती

रूढ अर्थाने प्रयोग आणि/किंवा निरीक्षणावर आधारित केलेला अभ्यास हा वैज्ञानिक अभ्यास म्हणता येईल. अशा अभ्यासात एक शिस्त असावी लागते. निरीक्षणे घेणारा वा प्रयोग करणारा हा कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रामाणिकपणे व तटस्थ राहून निरीक्षणे घेणारा असावा ही अशा अभ्यासाची पूर्व अट आहे. तरीदेखील या निरीक्षणांकडे कायम कठोर संशयवृत्तीने (scepticism) बघितल्या जाते; कारण मानवी आकलन आणि दृष्टिकोण हे बहुदा पूर्वग्रहयुक्त असतात. याहून महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे घेतलेली निरीक्षणे वा प्रयोगातील अनुभव यांच्या नोंदी इतरांना समजतील अश्या रीतीने ठेवाव्यात जेणेकरून दुसऱ्या अभ्यासकाला कामाची पुनरावृत्ती करून पूर्वी घेतलेल्या निरीक्षणाची वा अनुभवाची सत्यासत्यता तपासून पाहता येईल.

पुढे वाचा

सत्योत्तर संहिता

अडवून बसला जो वाट अंधाराची
त्या प्रकाशाला हटकावे कोणीतरी
मतैक्याला धरून बसती जेथे सारे
भेदनीती शिंपडावी तेथे कोणीतरी ||१||

चांगलेच चांगले घडत असेल कुठे
थोडेतरी विष पेरावे तेथे कोणीतरी
अमृताच्या झडत असताना पंगती
मदिरेची महती वर्णावी कोणीतरी ||२||

वाट असेल जर फुलांनी सजलेली
काटे थोडे अंथरावे तेथे कोणीतरी
शोधून सुखाधीन सगळे राजयोगी
दुःखात भिजवावे त्यांना कोणीतरी ||३|| 

सरळ जाणारे रस्त्यात भेटले कुणी
चकवा पेरावा रस्त्यावर कोणीतरी
दिसता कुणी पुजारी सभ्यतेचे कुठे
मूर्खांतच मोजावे तयांना कोणीतरी ||४||

सत्याचीच वाहवा केली जाते जिथे
सत्यापलाप पेरावा तिथे कोणीतरी
शब्दांनी सांधली जाते एकता जिथे
शब्दभ्रम पसरावेत तिथे कोणीतरी ||५||

सामूहिक शहाणीव आढळेल जिथे
“मी”चे पाढे वाचावे तिथे कोणीतरी
नेतृत्व सक्षम दिसून आले जर कुठे
प्रतिमाभंजन मंत्र गावे कोणीतरी ||६||

जयचंदांची होत असेल जर छी-थू
छद्मी जयचंद उभारावे कोणीतरी
सापडला जरी समाजकंटक स्पष्ट
‘तो मी नव्हेच’ सांगे तोच सर्वोपरी ||७||

@खिलीरामभाऊ

‘ती’चा सहभाग वाढो

जिच्या हाती पाळण्याची दोरी | तीच जगाते उद्धारी |
ऐसी वर्णिली मातेची थोरी | शेकडो गुरुहुनिही||

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्त्रीचे, पर्यायाने आईचे केलेले हे वर्णन. एकेकाळी कुटुंबापुरती मर्यादित असलेली स्त्रीची हुशारी, निर्णयक्षमता, धडाडी, संधी मिळाली तर ती स्त्री त्या संधीचे नक्कीच सोने करू शकते. इतिहासाचा आढावा घेतला तर राजमाता जिजाऊपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी सक्षमपणे राज्यकारभार करून आदर्श उदाहरणे आपल्यासमोर घालून दिली आहेत. परंतु अर्थात् स्त्रीचा प्रवासही सोपा नव्हता. अगदी जन्मापासून, शिक्षण मिळेपर्यंत, पसंतीने विवाह ठरविणे, करीअरचे क्षेत्र निवडणे अशा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला संघर्ष चुकलेला नाही.

पुढे वाचा

मनोगत

स्नेह.

येत्या एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’चा अंक प्रकाशित करतो आहोत. आव्हाने अनेक आहेत. भाजप आत्तापासूनच आपल्या सलग तिसऱ्या विजयाच्या दुदुंभी फुंकत आहे. INDIA आघाडी पर्याय म्हणून समोर यायला धडपडत आहे. निवडणुकांआधी प्रचार, अपप्रचार, कुप्रचार ह्यांचा कोलाहल असतोच. त्यात आता सोशल मीडिया, एआयचा वाढता वापर यांतून वाढलेला गोंधळ!! अश्यात सामान्य नागरिक मतदाता म्हणून विचारपूर्वक समोर येऊ शकतो आहे का हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे.

आपण प्रत्येकच जण पाच वर्षामधून एका दिवसासाठी मतदाता असतो, तर इतर पूर्ण वेळ जबाबदार नागरिक असतो.

पुढे वाचा

मोदींचे वर्चस्व देशाच्या विकासाला बाधक ठरेल का?

मूळ लेख: https://www.foreignaffairs.com/india/indias-feet-clay-modi

येत्या मे महिन्यातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला तर मोदींच्या अधिपत्याखाली आतापर्यंत कूर्मगतीने अमलात आणला जाणारा बहुसंख्याकवादाचा वेग लवकरच घोडदौडीत परिवर्तित होईल, आणि ही गोष्ट भारतीय राष्ट्रीयत्वाच्या मुळावरच आघात ठरेल.
परिणामस्वरूप, भारतदेखील पाकिस्तानासारखाच केवळ एक धार्मिक ओळख असलेला देश बनून राहील अशी साधार भीती लोकशाहीवादी आणि वैविध्यप्रेमी भारतीयांना वाटते.

या वर्षी एप्रिल/मे मध्ये भारतात १८ वी निवडणूक होणार आहे. आजपर्यन्त केलेल्या सर्वेक्षणांतून असे दिसून येते की सध्याचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा यश मिळणार आहे.

पुढे वाचा