हिंदू-मुस्लिम संघर्ष खरा दोन मनांमधील प्रवृत्तींचा आहे….
मुस्लिम मन हे स्वभावतः विस्तारवादी आहे, कारण ते धर्मविस्तारवादी आहे. हिंदू हा बंधनवादी आहे. सीमा ओलांडावयाच्या नाहीत हा त्याने स्वतःवर घालून घेतलेला नियम….. तेव्हा हिंदू पुरेसा चैतन्यशील होण्यावर हिंदू-मुस्लिम संबंधाचे स्वरूप अवलंबून आहे….
ही चैतन्यशीलता येणे आणि मनाचा समतोलपणा साध्य होणे हे मुस्लिम राजकारणाचे आव्हान स्वीकारण्याचे खरे दोन उपाय आहेत. हिंदू सनातनीपणा कमी कमी होत जाणे, जाती नष्ट होणे, सामाजिक समतेच्या आणि मानवतेच्या मूलभूत कसोटीवर आधारलेल्या समाजाकडे चालू असलेली हिंदूंची वाटचाल अधिक जोराची होणे, हिंदू खऱ्या आधुनिकतेचा स्वीकार करीत असलेला दिसणे हे उपाय आहेत.