विविधतेमध्ये अनेकता

दगडापेक्षा विदा मऊ

भारतातील मुलांच्या मनावर लहानपणापासून पाठ्यपुस्तकांद्वारे ठसवले जाते की भारतात विविधता आहे आणि विविधता असूनही एकता आहे. विविधतेत खाद्यपदार्थ, पेहराव, भौगोलिक स्थिती वगैरे गोष्टी येतात आणि एकतेत मुख्यतः भारतीय असणे आणि त्याचा अभिमान असणे हे. बहुतांश भारतीय हिंदू असूनही विविधतेमध्ये धार्मिक पैलू पण अध्याहृत असत आणि एकता मात्र देशाभिमानाद्वारे केवळ भारतीयता हीच. पाठ्यपुस्तकांमधील हे चित्र फारसे बदलले नाही. प्रत्यक्षात मात्र त्यात थोडीफार तफावत नेहमीच राहिली आहे. काही वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. साहजिकच समोरच्या रांगेत बसून त्या मुलामुलींचे कार्यक्रम पाहिले – नाच, गाणी आणि काही नाटुकल्या.

पुढे वाचा

इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने
उडवून नेलीत काही पत्रे,
तुटून पडले काही पंख..!

सोबतीने आलेला मित्र
शांत थोडीच राहणार…!

जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते..
समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले
अन् वावरेच धो – धो वाहू लागली!

तुटलेल्या छपराला
चिकटलेले आहेत
फक्त काही कोरडे अश्रू!

एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय..
एकमेव दागिना मोडून
गुलाल उधळत आणला होता..
तशा.. बांगड्या बाकी होत्या!

वावरातील पिकांचा
उडालेला हिरवा रंग,
आणि निस्तेज पडलेले
वखर आणि पांभर..
टक लावून बघतायेत
आकाशाकडे..

भुरकट पडलेल्या पिकांना
कोपर्‍यात पडलेल्या औषधांची आता गरज नव्हती…
मरून पडलेल्या बैलाच्या मागे राहिलेल्या दोराला मात्र
हवा होता एक नवा गळा!

पुढे वाचा

तुम्ही कुठल्या इंडियातले?

वीर दास ह्या विनोदी अभिनेत्याने “I come from two Indias” नावाचे कवितावजा स्फुट अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथील केनेडी सेंटरमध्ये नोव्हेंबरमध्ये सादर केले व त्याची दृकश्राव्य फीत समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली. ह्या घटनेने एकच हलकल्लोळ उडाला. त्यानं सादर केलं आहे त्यावर “कसला भारी बोलला हा” इथपासून ते “कोण हा टिकोजीराव? ह्याला कुठे काय बोलावे याची काही अक्कल तरी आहे का?” इथपर्यंत सर्व तऱ्हेच्या प्रतिक्रिया आल्या. ध्रुवीकरण झालेल्या आपल्या देशात आजकाल कुठल्याही लोकप्रिय नेत्याच्या विरोधात काही बोलणे म्हणजे देशद्रोह आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे ही देशप्रेमाची व्याख्या होऊ लागली आहे. त्यामुळे अशा टोकाच्या प्रतिक्रिया येणे अभिप्रेतच होते. अर्थातच

पुढे वाचा

न्याय आणि राज्यव्यवस्था: सध्याचे वास्तव

न्याय या संकल्पनेची व्याख्या करणे कठीण आहे. त्यात आपल्या घटनेच्या प्रास्ताविकात समावेश झालेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे गोष्टी तर आहेतच पण आणखीही काही आहे. त्यापैकी एक म्हणजे बहुतेक संस्कृतींनी मान्य केलेली परस्परत्वाची भावना आणि त्यातून आलेला सुवर्ण नियम Treat others as you would like others to treat you. हा नियम परस्पर सहकार्याच्या तत्त्वात विकसित होतो आणि न्यायप्रक्रिया राबवण्यात उपयोगी पडतो. यावर आणि इतर काही संलग्न तत्त्वांवर आधारित संस्थागत न्यायशास्त्राची मांडणी (Theory of Justice) जॉन रॉल्स नावाच्या तत्त्वज्ञाने केली आहे.

पुढे वाचा

काळ बदलत आहे

१.

जेव्हा केव्हा हुकमती राजवटीने मोडू पाहिला लोकशाहीचा कणा
फिरवून टाकल्या सत्तेच्या दिशा
पुसटश्या उजेडालाही झाकोळून टाकण्याच्या वाटल्या खिरापती
तेव्हाही या जुलुमशाहीच्या आखाड्यात कोणीतरी लढत होतंच
आणि आता शेतकरी आहेत…!

२.

तू आहेस म्हणून
काटेरी सत्तेला प्रश्नांनी देता येतात तडे
बेबंदशाहीच्या सिंहासनाची उखडता येतात पाळंमुळं
जेव्हा कधी नाकारला गेला जगण्याचा हक्क
तेव्हा तेव्हा नव्याने पुकारला एल्गार… तू आहेस संघर्षाची अमाप शक्ती

तू आहेस…
बुद्ध.. तुकोबा.. छत्रपती.. ज्योतिबा.. शाहू.. बाबासाहेब…!

३.

अजूनही का नाही सरत रात्र
म्हणून त्याने साऱ्याच खिडक्या उघडून ठेवल्या
दरवाजे कुलूपबंद ठेवून
दिस उजाडाची पाहत होता वाट… सारं करुन सुद्धा कुठे दिसलीच नाही उगवती

हे पाहून…
सोडून त्याचा पदर
भयभीत काळ्याकुट्ट अंधारातही
ती पेटून उठली मशानातून…
उखडून फेकल्या दरवाज्याच्या चौकटी
आणि उजळून टाकल्या मुर्दाड वस्त्या…!

पुढे वाचा

‘जयभीम’ – जातीय व कायदेशीर संघर्षाचे उत्कृष्ट चित्रण!

‘जयभीम’ हा तमीळ सिनेमा जबरदस्त आहे. इतर अनेक भाषांत तो OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपण जातीय अन्यायग्रस्तांना कसा न्याय मिळवून देऊ शकतो याचे, हा सिनेमा उत्कृष्ट उदाहरण आहे. सामाजिक भान असलेल्या वकीलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच जेलमधून सुटलेल्यांना त्यांची जात विचारून त्यातील SC/ST ना जेलर वेगळे उभे करतो व इतरांना घरी सोडतो. त्यांना घेण्यासाठी विविध पोलिसस्टेशनचे इन्स्पेक्टर आलेले असतात, जे यांना प्रलंबित खटल्यांमध्ये अडकवण्यासाठी पुन्हा घेऊन जातात हे दाखवले आहे.

पुढे वाचा

अमेरिके, ट्रम्पची रात्र आहे; भारता, जागा रहा

अमेरिकेत २०१६ साली रिपब्लिकन पक्षाचे डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्याचे सर्वांत मोठें आश्चर्य त्यांना स्वतःलाच वाटले होते. जरी निवडणुकीआधी खुद्द नरेंद्र मोदी ट्रम्प यांची उत्साहाने भलावण करून गेले होते तरी!

अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या जागतिकीकरण धोरणामुळे हजारो अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्या कमी वेतनात काम करून घेणाऱ्या देशात पसार झाल्या. इतकेच नव्हे तर परदेशातून अमेरिकेत आलेल्या लक्षावधी कामगारांनी गोऱ्या लोकांपेक्षा कमी वेतनात नोकऱ्या स्विकारल्या.त्यांच्या बेकारीला आणि असंतोषाला कोणत्याच राजकीय पक्षाकडे उत्तर नव्हते. त्यांतून खतपाणी मिळालेल्या वर्णद्वेषाला डॉनल्ड ट्रम्पने इंधन घातले. गौरेतरांना आणि मुसलमानांना अमेरिकेत येऊ देणार नाही असे आश्वासन दिले. मात्र

पुढे वाचा

लोकशाही, राजकारण आणि द्वेषपूर्ण भाषण

हरिद्वारच्या कथित ‘धर्मसंसद’मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या घटनेसंदर्भात रविवार, २६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. या द्वेषपूर्ण भाषणांची सु-मोटो दखल घेण्याची विनंती या पत्रात सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक नेत्यांनी नरसंहाराची हाक देशासाठी “गंभीर धोका” असल्याचे म्हटले आहे. ‘धर्म संसद’मध्ये केलेल्या वादग्रस्त चिथावणीखोर विधानांवरून नागरी समाजासह डाव्या पक्षांनीही सोमवारी २७ डिसेंबर रोजी दिल्लीतील उत्तराखंड भवनात निदर्शने केली. या निदर्शनात नरसंहाराची मागणी करणाऱ्या तथाकथित संतांना त्वरित अटक करण्याची आणि अशा द्वेषपूर्ण परिषदांच्या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

पुढे वाचा

मराठी साहित्य सम्मेलनाचा अखिल भारतीय तमाशा

आपले तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलन परंपरेप्रमाणे आपला घरंदाज घाटीपणा सिद्ध करून गेले. माय मराठी, माझा मऱ्हाटीची बोलू कवतुके, लाभले भाग्य आम्हा, मराठी माणूस, अणूरेणू या तोकडा, मराठी वर्ष, मराठी अस्मिता….. अशा नानाविध अस्मितादर्शी पताका आम्ही रोवल्या आहेत. हे आम्ही पांघरलेलं वाघाचं कातडं, साहित्यसम्मेलनात आपोआप गळून पडतं. साहित्यसम्मेलन आलं की गर्दी जमवण्यासाठी आम्हाला कुणी चिंटू भगत, जावेदभाऊ अख्तर यांच्या रूपाने वाघ बाहेरून आणावा लागतो. आणि आम्ही सारे बनगरवाडीतील मेंढरं म्हणून आपले घरंदाज घाटीपण खालच्या मानेनं सिद्ध करतो.

सम्मेलन जाहीर झाले की बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा आधीच बेतलेला/pre-cooked वाद सुरू करून आम्ही माय मराठीच्या अस्मितेवर थुंकायला सुरुवात करून आमच्या घरंदाज घाटी ॲटिट्यूडची दिवाळी साजरी करायला सुरुवात करतो.

पुढे वाचा

अर्थात! तुमचे बोट तुमच्याच डोळ्यात…!

नागरीकरणाच्या प्रक्रियेत माणूस कधीतरी टोळी करून राहू लागला. त्याची अवस्था जरी रानटी असली तरी शेतीच्या शोधाने काही प्रमाणात का होईना त्याच्या जगण्याला स्थिरता लाभली. संवादाच्या गरजेतून भाषा निपजली. व्यक्तिंच्या एकत्रीकरणातून समाज निर्माण झाला. पुढे कधीतरी ‘राष्ट्र’, ‘देश’ ह्या संज्ञा रूढ झाल्या. अनाकलनीय घटकांच्या भीतीतून वा नैतिक शिकवणुकीसाठी धर्म समोर आला. धर्म मानवाला तथाकथित नीती शिकवू लागला. ह्या धर्माला प्रचलित रूप देण्यात व समाजावर हा धर्म थोपवण्यात एका विशिष्ट समूहाचे वर्चस्व दिसून येते.

पुढे वाचा