चारचौघी

चारचौघी पाहिले त्यावेळी त्या नाटकाने बऱ्यापैकी वादळ उठविले होते. मिळून साऱ्याजणीने चर्चा घडवून आणली होती. उत्तरे शोधत असणाऱ्या या चौघी प्रश्नच जास्त उभे करतात असे वाटले. या चौघीतली आई एक सुविद्य शिक्षिका. तीन मुलींची अविवाहित माता. मुलींचे वडील आबा स्वतःचा स्वतंत्र संसार सांभाळून या तीन मुलींचे जन्मदाते होतात. त्यांच्या आईशी लग्न न करता.

बहिणींतली मोठी विद्या. नावाप्रमाणे शिकून एम्. ए., पीएच.डी झाली. कॉलेजात प्राध्यापक म्हणून यशस्वी झालेली. तिचा नवरा आशिस हा पत्रकार. त्याचे एका सहव्यावसायिकेबरोबर लफडे सुरू असल्याचे पाहून त्याच्याशी भांडून विद्या आईकडे माघारी आलेली.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण – समतामूलक पर्यावरणवादी वैश्विक समाजरचनेचा वेध

या विश्वपसाऱ्यामध्ये माणसाचे स्थान खरे तर बिंदुवत्. परंतु निसर्गाने बहाल केलेल्या बुद्धिमत्तेमुळे माणूस पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रापेक्षा वरचढ ठरला, तर सुखासीनतेच्या लालसेतून एका शोषणयुक्त समाजव्यवस्थेचा तो प्रेरक ठरला. आज पृथ्वीवरील सृष्टीचे एकूणच अस्तित्व माणसाच्या विवेकी वा अविवेकी वागणुकीने ठरणार आहे. माणसाचे जीवसृष्टीतील नेमके स्थान, त्याच्या प्रेरक व कारक शक्ती, त्याच्या स्वभावाची गुंतागुंत, त्याच्या जीवनातील ईश्वरी प्रेरणेचे स्थान, मानवी जीवनाचे प्रयोजन हे नेहमीच अध्यात्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांचे चिंतनाचे विषय राहिले आहेत. श्री. श्रीकांत कारंजेकर यांनी लिहिलेल्या “वैश्विक जीवनाचा अर्थ ” या छोट्या पुस्तकातून अशाच प्रश्नांचा इहवादी दृष्टिकोनातून मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुढे वाचा

मनुस्मृती व विवेक

आपल्या चालीरीतींवरील मनुस्मृतींचा पगडा किंवा नामवंतांनी केलेला तिचा पुरस्कार पाहिल्यावर आपण मनुस्मृती वाचण्यास उद्युक्त होतो. वे.शा.सं. विष्णुशास्त्री बापट यांचे मनुस्मृतीचे संपूर्ण मराठी भाषांतर (प्रकाशक: रघुवंशी प्रकाशन, मुंबई) आपल्या तत्संबंधीच्या बहुतांश गरजा पूर्ण करते. चालीरीतींवर जसा परंपरागत संस्कारांचा प्रभाव असतो, तसाच तो त्याविषयी साकल्याने विचार करणाऱ्या सामाजिक नेतृत्वाचाही असतो. हे नेतृत्व जेव्हा, “हे सर्व समाजाच्या व व्यक्तींच्या हितासाठी आहे,” अशी भूमिका घेते, तेव्हा त्यातील तथ्य जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, व हाच या लेखामागील हेतू आहे. केवळ धर्मवाक्य म्हणून ज्यांची श्रद्धा मनुस्मृतीत गुंतली आहे, त्यांच्यासाठी प्रस्तुत भाषांतर हे निश्चितच उपयोगी आहे.

पुढे वाचा

प्रोफेसर रेगे –एक उत्तमपुरुष

प्रोफेसर रेगे हे एक कूट आहे. त्याला अनेक उपांगे आहेत. त्यातली काही उकलतात. काहींच्या उत्तरासाठी त्यांनाच बोलते करावे लागेल.

एक सोपे कोडे असे की प्रो. रेगे यांची योग्यता आणि त्यांना मिळालेली मान्यता यांत एवढी तफावत का?

तत्त्वज्ञान हा रेग्यांचा प्रांत. त्यात आज अग्रपूजेचा मान त्यांचा. महाराष्ट्रातच नाही तर अखिल भारतात. तो त्यांना लाभलेला अजून दिसत नाही. मात्र त्याचे दुःख त्यांना नाही. इष्टमित्रांनाच तेवढी हळहळ. भारतात स्वातंत्र्याच्या पहाटेच तत्त्वज्ञानाला बरे दिवस लाभले. इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च स्थापन झाली. निवडक विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अध्ययनास्तव अॅडव्हान्स्ड सेंटर्स उघडली गेली.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ११)

आयडियलिझम (Idealism) म्हणजे काय ?

रशियामध्ये १९१७ साली क्रांती झाली आणि तेथे मार्क्सप्रणीत कम्युनिस्ट राजवट स्थापन झाली. एवढे मोठे राजकीय यश मिळाल्यामुळे मार्क्सवादाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त झाली. जगभर वेगवेगळ्या देशात कम्युनिस्ट पक्षांची स्थापना झाली आणि कम्युनिस्ट चळवळी सुरू झाल्या. अनेक ठिकाणी त्यांची सरकारेही स्थापन झाली. भारतातही हे लोण लगेच येऊन पोचले आणि नव्या युगाचे तत्त्वज्ञान म्हणून मार्क्सवादाचा पुरस्कार ‘पुरोगामी’ मंडळींकडून करण्यात आला. मार्क्सच्या ग्रंथांचा अभ्यास होऊ लागला.

परंतु मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला हेगेलच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी होती, आणि हेगेलच्या तत्त्वज्ञानाला दोन हजार वर्षांची दीर्घ परंपरा, आणि विशेषतः दोनशे वर्षांची परंपरा, यांची पार्श्वभूमी होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारकच्या चौथ्या वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या (एप्रिल-मे १९९३) जोड अंकाच्या संपादकीयातील मला महत्त्वाची वाटलेली वाक्ये उद्धृत करून त्यांना अनुलक्षून मी काही सूचना करू इच्छितो. ही वाक्ये अशी- “बालमृत्यू घडवून आणणाऱ्या कारणांना न सुदृढ होत जुमानता आजचा सुधारक ज्या चिवटपणाने उभा आहे त्यावरून हे बाळ असेच जाईल आणि दीर्घायुषी होईल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. परंतु ते अजून स्वावलंबी होण्याइतके सुदृढ झालेले नाही हेही सांगितलेच पाहिजे.”

(अ) मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराविषयीच्या सूचना

१) कोणताही लेख जास्तीत जास्त एक हजार शब्दांचा म्हणजे मासिकाच्या तीन पानांइतकाच राहील याची सर्व लेखकांनी कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे.

पुढे वाचा

संपादकीय विशेषांकांची योजना

आजचा सुधारक ह्या आमच्या मासिकाच्या गेल्या अंदाजे चार वर्षांच्या वाटचालीत आम्ही तीन परिसंवाद विशेषांकांच्या स्वरूपात प्रकाशित केले. वा. म. जोशी ह्यांचे विवेकवादी लिखाण ह्यावर पहिला विशेषांक, धर्मनिरपेक्षता ह्यावर दुसरा आणि निसर्ग आणि मानव ह्या विषयावर तिसरा. ह्या तीनही विशेषांकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या विशेषांकांची योजना केली आहे.
या विशेषांकांचे एक वैशिष्ट्य असे राहील की त्यांच्या संपादनाचे काम आम्ही महाराष्ट्रातील प्रथितयश मंडळीकडे सोपविले असून त्यांला अनुकूल प्रतिसादही आहे.
तूर्त आमच्या नजरेसमोर असलेले काही विषय पुढीलप्रमाणे आहेत.
* समान नागरी कायदा
* शिक्षण पद्धतीतील आवश्यक बदल .

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
मुस्लिम प्रश्नासंबंधात श्री वसंत पळशीकरांना ‘वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या शहामृगाची उपमा देणारे मा. श्री. रिसबूड यांचे पत्र वाचले. (नोव्हें. ९३) “(हिंदूंच्या) सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणते प्रयत्न (हिंदूंकडून) झाले.?” असा पळशीकरांचा प्रश्न आहे. या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई यांनी केलेली आहे. मुस्लिमांचे मन वळविण्यापूर्वी त्यांचे ‘मन’ आहे तरी काय? त्यांना पाहिजे आहे तरी काय ? हे समजून घ्यावे लागते. कुरुंदकरांनी या प्रश्नाची . मूलगामी चिकित्सा त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या प्रकरणात पुढीलप्रमाणे केलेली आहे:
भारतीय मुसलमानांची कायमची एक तक्रार असते की, त्यांना भारतीय घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेले नाही.

पुढे वाचा

चर्चा

त्या अनाठायी औदार्याने काय साधले?
श्री संपादक, आजचा सुधारक यांसी स. न. वि.
त्या घटनेला आता ४५ वर्षे होऊन गेली आहेत. तिचा विचार आज अलिप्तपणे करता येतो का, हे पहावे अशा उद्देशाने हे लिहीत आहे. सुरुवातीलाच हे अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की गांधी-हत्येशी या चर्चेचा संबंध जोडायचा नाही ही या चर्चेची पूर्व अट आहे.
सर्वानाच माहीत असलेली पाश्वभूमी मी माझ्या पद्धतीने थोडक्यात सांगतो. काश्मीर नरेशांनी पाकिस्तानी आक्रमणामुळे हतबल होऊन भारताशी सामीलनामा केला, आणि काश्मीर हा भारताचा भूभाग बनला. भारतीय फौजा श्रीनगर वाचवण्यासाठी धावल्या, आणि एका अघोषित युद्धास तोंड लागले.

पुढे वाचा

अकुतोभय गीता साने -२

विनोबांची पदयात्रा होऊन गेल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर ६१ मध्ये गीताबाई चंबळ-घाटीत गेल्या. जिथे जिथे विनोबा गेले तिथे तिथे बाई गेल्या. सोबत अर्थात् विनोबांनी स्थापन केलेल्या शांतिसमितीच्या कार्यकर्त्यांची होती. घाटीतील जनता अशा प्रकारच्या चौकश्यांना सरावली होती. ठरीव साच्याची पढविल्याप्रमाणे उत्तरे येत. म्हणून गीताबाईंनी आपला मोर्चा अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्याकडे वळवला. कारण आचार्यांच्या पदयात्रेवेळी खरा पीडित अस्पृश्य वर्ग अलक्षित राहिला होता. स्त्रियांशी संवाद साधल्यामुळे त्यांना सत्याच्या अधिक जवळ जाता आले.
चंबळ घाटीत जाण्यापूर्वी डाकूच्या प्रश्नावरचे साहित्य त्यांनी धुंडाळले, तेव्हा त्यांना दोनच पुस्तके मिळाली.

पुढे वाचा