न्यायाच्या दाराशी

एक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहीत आहे की हा रस्ता न्यायाचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर..

पण हे काय? थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला. मात्र आता समोर वळण दिसत आहे आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट.. एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला. काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा.. 

चिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते..

पुढे वाचा

मनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध

मूळ लेखक : एड्रिजा रॉयचौधरी

वैवाहिक जोडीदार ठरविण्याची विवाहव्यवस्था जातीची शुद्धता टिकवून ठेवण्याच्या कल्पनेमधून आली आहे, याबद्दल अनेक समाजशास्त्रज्ञ सहमत आहेत. त्याचवेळी ठरवून केलेल्या विवाहाची संकल्पनासुद्धा राजकीय आणि आर्थिक गरजांमध्ये खोलवर रुजलेली होती. 

indian matchmaking, indian matchmaking series, indian matchmaking netflix, arranged marriage, arranged marriage in india, arranged marriage challenges, sima taparia, sima taparia indian matchmaking, sima taparia news, who is sima taparia, sima taparia arranged marriage,

(भारतीय विवाहाची संकल्पना, विशेषतः ठरवून केलेल्या लग्नाची संकल्पना, ही पश्‍चिमेकडील देशांमधील लोकांसाठी खूपच आकर्षणाची बाब आहे.)

काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक तरुण विद्यार्थी म्हणून राहत असताना भारतातील एकमेवाद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक आचरणपद्धतीने वा परंपरांनी भुललेल्या जिज्ञासू परकियांना वारंवार भेटायचो. सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीला भारतीय आहार ते चित्रपट आणि कुटुंब अशा अनेक भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिदृश्यांबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे.

पुढे वाचा

न्यायासाठी संवाद आवश्यक

काही दिवसांपूर्वी क्षमावाणी दिवस होता. दरवर्षी या दिवशी जैन लोक त्यांनी कळत नकळत केलेल्या दुष्कृत्यांबद्दल क्षमायाचना करतात. कॉलेजच्या वेळेच्या मित्रमैत्रिणींच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्यादिवशी क्षमायाचनेचा असा एक संदेश एका जैन मैत्रिणीकडून आला. आम्ही सर्व गेल्या काही दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. यातील बहुतांश भारतात आहेत. अधूनमधून थट्टामस्करी, सठी-सहामाशी भेटीगाठी होत असतात. तो संदेश दिसल्यावर अनेक लोकांचे जोडलेल्या हातांचे ईमोजी आले. एकाने मिच्छामी दुक्क्डम हा त्या दिवसाशी संबंधित प्राकृत वाक्यांश लिहिला. मी लिहिले ‘यु आर फरगिव्हन’. आता मागितली कोणी क्षमा तर आपणही करावं ना मन मोठं.

पुढे वाचा

विवाहबाह्य संबंध

सर्वांत प्रसिद्ध असं उच्चवर्गीयातलं विवाहबाह्य प्रेमप्रकरण होतं, अमिताभ व रेखा यांचं. पण अखेरीस त्यांनाही थांबावं लागलंच … कुटुंबासाठी, समाजासाठी. 

नियम कितीही केले तरी माणूस हा चुकतमाकतच जगत असतो. मोहमाया त्याला जाळ्यात ओढायचं काम करत असते. त्यात तो नकळतही सापडू शकतो. 

आवडता पदार्थ नाही का जरा जास्तच खाल्ला जातो आणि मग अपचनावरचं औषध घ्यावं लागतं. तसं कधीतरी एखादी परस्त्री किंवा परपुरुष आवडतो. योगायोगाने तिकडून सिग्नल मिळालाच तर सुरू होतो भेटीगाठींचा सिलसिला. संबंध पुढे जातात, वाढतात, प्रेमाची पूर्तता होते. 

ती झाली तरी चोरटेपणाचे अपराधगंड निर्माण होऊ शकतात.

पुढे वाचा

अज्ञानकोश

पुस्तकांमधील ‘शामची आई’ जशी आठवणीत आहे; तशी कित्येक पुस्तकंसुद्धा. अशीच एक आठवण. मी लहान असताना एकदा शास्त्रीजींकडे (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) बाबांचं काही काम होतं. ते मलाही घेऊन गेले. एका विद्वान व्यक्तीला आपण भेटणार आहोत एवढीच माझी समज. मी गेलो. पुस्तकांच्या गराड्यातच ते बसले होते. त्यांची आणि बाबांची काय चर्चा झाली हे काही मला कळत नव्हतं, पण तिथल्या एका पुस्तकाकडे मात्र माझं लक्ष खिळून राहिलं.

ते पुस्तक होतं ‘अज्ञानकोश’ (Encyclopaedia of ignorance)! माझ्या नजरेतली उत्सुकता पाहून शास्त्रीजींनीच मला माहिती दिली. 

ते संपादित करत होते तो विश्वकोश, तो तर ज्ञानाचा कोश, सतत वर्धिष्णू होणारा आणि हा होता अज्ञानकोश.

पुढे वाचा

परीसस्पर्श वाचनाचा

बेथ जॉन्सन यांच्या ‘Reading changed my life’ या पुस्तकाचा मधुवंती भागवत यांनी केलेला अनुवाद
– ‘परीसस्पर्श वाचनाचा’

वाचनशिक्षण हा शिक्षकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. साक्षरताप्रसार ही जगभरात आणि भारतात देशांच्या प्रगतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातही आपण असे म्हणतो की स्त्री साक्षर झाली की कुटुंब साक्षर होते. अनंत अडचणींना तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साक्षर होणाऱ्या मुली आणि स्त्रिया सर्व देशांत आढळतात आणि आपल्या कुटुंबासाठी तसेच समाजासाठी प्रेरक ठरतात. याचा प्रत्यय देणारे बेथ जॉन्सन यांचे आणि मधुवंती भागवत यांनी अनुवादित केलेले ‘Reading changed my life’ अर्थात ‘परीसस्पर्श वाचनाचा’ हे पुस्तक अत्यंत गुंगवून टाकणारे आणि स्तिमित करणारे आहे.

पुढे वाचा

इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २

“The educator has to be educated,in modern jargon,the brain of the brain-washer has itself been washed.”  — Karl Marx

इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान हे जेव्हा इतिहासाला स्व-रूपाची जाणीव झाली व ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली; तेव्हाच निर्माण होणे शक्य होते. अशी जाणीव पाश्चात्य परंपरेत आपल्याला अठराव्या शतकापासून निर्माण होत आलेली दिसून येते. ही इतिहासविषयक ‘जाणीवेची जाणीव’ असल्याने तिचे स्वरूप ‘चिकित्सक’ होते. इतिहासाविषयीची ही तत्त्वज्ञानात्मक चिकित्सा दोन दिशांनी झालेली आढळून येते. ह्या दोन दिशांतील मूलभूत भेद त्यांच्या मानवी प्रकृतीविषयक तत्त्वज्ञानात, तसेच इतिहास संशोधनाच्या रीतींमधील भेदांमध्ये आहे.

पुढे वाचा

दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… ?

भारतात बहुतांश आदिवासी समुदाय आहेत. त्यापैकी फासेपारधी हा एक समाज. हा समाज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. फासेपारधी समाजातल्या माणसांवर आत्ताही हल्ले होतात. पोलिसांकडून आणि न्यायव्यवस्थेकडून वेळोवेळी छळवणूक होत राहते. त्यात आता आणखी भर म्हणजे बेड्या-तांड्यांपासून जवळ असणाऱ्या गावातल्या लोकांकडून होणारा अत्याचार.

चार महिन्यांपूर्वीची एक घटना आहे. टिटवा बेड्यावरच्या दोन पारधी तरुणांना बाजूच्या गावातल्या लोकांनी खूप मारलं. गावात वीजपुरवठा करणारी डीपी जाळून टाकली. सहा महिने बेड्यावरची बाया-माणसं, लहान लेकरं अंधारात राहिली. हे प्रकरण गावातल्या सरपंचाच्या मध्यस्थीनं मिटवण्यात आलं; परंतु मारहाण झालेल्या तरुणांना न्याय मिळाला नाही.

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग ४)

आणीबाणीच्या काळापासून मला काश्मीरमधे अनेक वेळा जाण्याची संधी मिळाली असून या ४७ वर्षांत मी किती वेळा गेलो आहे तेदेखील मला आठवत नाही. तसेच १९७५-७७ मध्ये आतंकवाद हा शब्ददेखील ऐकलेला मला आठवत नाही.

उलट बलराज पूरी व वेद भसीन यांसारख्या जुन्या समाजवादी मित्रांनी सांगितलेले आठवते की “काश्मीरच्या इतिहासात १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार असताना प्रथमच फ्री आणि फेअर निवडणूक पार पडली. त्यानंतर दहा वर्षांनी १९८७ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन केंद्रातील सरकारने प्रचंड प्रमाणात हस्तक्षेप करून, संरक्षणदलाची मदत घेऊन संपूर्ण निवडणूक आपल्याला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आटोपली.

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग ३)

(प्रस्तुत लेखकाचे ‘काश्मीरचे वर्तमान’ ह्या लेखाचे दोन भाग आजचा सुधारक’ने डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ या अंकांमध्ये प्रकाशित केले होते. ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा काश्मीरला जाऊन आल्यानंतरचे त्यांचे अनुभव त्यांनी पुन्हा एकदा ‘आजचा सुधारक’मध्ये प्रकाशित करण्यासाठी पाठवले आहेत. ते भाग ३ व भाग ४ असे आपण प्रकाशित करतो आहोत. देशाच्या राजकीय पटलावरील बदलाचा काश्मीरच्या सामाजिक स्थितीवर किती आणि कसा प्रभाव पडला आहे याचे इत्थंभूत वर्णन त्यांनी येथे केले आहे.)

काश्मीरला बळाद्वारे कुणीही जिंकू शकत नाही, केवळ पुण्याने आणि प्रेमानेच जिंकू शकता.

पुढे वाचा