जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता

मेरिअम वेब्स्टर नावाच्या नामवंत शब्दकोशात जेव्हा आपण ‘intelligence’ ह्या शब्दाची व्याख्या शोधू पाहतो तेव्हा ज्या काही व्याख्या येतात त्या सर्व व्याख्यांचा सारांश हा मी माझ्या शब्दात असा मांडतो; ‘स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून स्वतःच्या परिस्थितीचे पृथक्करण व त्या परिस्थितीत योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी करता येऊ शकणारा सर्जनशील प्रयत्न’. 

संगणक हा त्याच्याकडे असलेल्या बायनरी स्मृतीचा वापर करून त्यांच्या गणिती क्षमतेनुसार माहितीचा साठा नक्कीच करू शकतो परंतु त्या माहितीचे पृथक्करण करणे त्याला शक्य नाही. संगणक गणिती ज्ञान सहजपणे हाताळू शकतो आणि मोठमोठी गणिते चुटकीसरशी हातावेगळी करू शकतो परंतु त्याला तशा सूचना देणे मात्र गरजेचे असते आणि त्या सूचना फक्त मानवच देऊ शकतो.

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञा वापराचे तारतम्य शक्य होईल का?

मानवी जीवन हे सतत आपल्या अडचणी आणि गरजांमधून शिकत, त्यावर तोडगा म्हणून नवनवीन उपकरणे, युक्त्या, क्लृप्त्या, तंत्र इत्यादी शोधत, विकसित होत गेले आहे. या सगळ्यामुळे मानवी जीवन सुरुवातीला नेहमीच सुखकर, सहज झाले खरे, पण या सर्व उपायांमुळे नवे प्रश्न नक्कीच उभे राहत आले आहेत. हे चक्र अखंड सुरू आहे आणि यापुढेही राहील. मागील काही दशकांपासून विकसित झालेले तंत्रज्ञान, उदाहरणार्थ विमान, अणुऊर्जा, वीज, टीव्ही, फोन, इंटरनेट, मोबाईल, स्मार्टफोन, सीसीटीव्ही, क्लाऊड टेक्नॉलॉजी इत्यादी, आणि आता कृत्रिमप्रज्ञा.

या सर्वांचा दैनंदिन जीवनात समावेश/वापर वाढत गेला, आणि या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यावर प्रथमदर्शनी आपले जीवन सहज/सोपे/सुखकारक झाले असे नक्कीच म्हणता येईल.

पुढे वाचा

नव्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधणार?

जुलै २०२२ मध्ये ब्लेक लेमोईन या इंजिनीयरला गूगलच्या गुप्ततेच्या कराराचा भंग केल्याबद्दल प्रथम सक्तीच्या रजेवर पाठवले आणि नंतर बडतर्फ केले. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (यापुढे आपण ए.आय. किंवा कृत्रिमप्रज्ञा म्हणू) विभागात काम करत होता. गूगलचे लार्ज लॅंगवेज मॉडेल (दीर्घ भाषा प्रारूप) ‘लामडा‘सोबत केलेली विविध संभाषणे त्याने प्रसिद्ध केली आणि ‘लामडा’ ही कृत्रिमप्रज्ञा असूनही संवेदनशील आहे असे त्याने जाहीर केले. 

२ मे २०२३ रोजी कृत्रिमप्रज्ञेचे पितामह आणि ट्युरिंग पारितोषकाचे मानकरी जॉफरी हिंटन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी गूगलचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले, “वातावरणबदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञा जास्त धोकादायक आहे.”

पुढे वाचा

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग १

जगाच्या इतिहासात जी प्रतिभावंतांची मांदियाळी होऊन गेली, त्यांपैकी मूलगामी विचारवंत म्हणून संपूर्ण जगाला परिचित असलेल्या कार्ल मार्क्सच्या अर्थशास्त्राची अन्वेषणा करण्याचे येथे योजले आहे. ही अन्वेषणा मुख्यत: मार्क्सच्या अर्थशास्त्रीय दृष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न करते.

मार्क्सला स्वीकारण्या अथवा नाकारण्याऐवजी त्याला समजून घेण्यात ज्यांना रस आहे, केवळ अशा व्यक्तींच्या दृष्टीनेच ह्या लेखमालेस काही मूल्य असू शकेल.

प्रस्तुत लेखनाचा हेतू हा मार्क्सच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणाची विद्यमान अर्थशास्त्राशी तुलना करणे आणि मार्क्सच्या अर्थविचारांवर भाष्य करणे, असा आहे. मार्क्सविचारातील क्षमतास्थळे व कमकुवत स्थळे कोणती याची जाणीव करून घेत, अर्थशास्त्राच्या आधुनिक वैचारिक परंपरेच्या प्रकाशात मार्क्सविचाराचा वेध घेणे, हा या लेखनाचा उद्देश आहे.

पुढे वाचा

आवाहन

स्नेह.

कम्प्युटर्सच्या सुरुवातीच्या काळापासून अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हटले जायचे की Computer is a tool which is as intelligent as the person using it. कृत्रिमप्रज्ञेमुळे आता तो समोरच्या माणसाच्या बुद्धीहून ‘अधिक बुद्धिमत्ते’ची कामे करू शकतो असे भासू लागले आहे. ‘एआय’ला खाद्य म्हणून खूप जास्त डेटा पुरवला जातो. शिवाय या डिजिटल प्रणालींकडे एकमेकींकडून माहिती सामायिक करण्याची क्षमताही असतेच. डेटावर प्रक्रिया करण्याचा या प्रणालींचा वेग मानवी मेंदूपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो. या सगळ्यामुळे मिळणारे परिणाम स्तिमित करणारे आहेत. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरातून बनलेली ChatGPT सारखी Language Model Toolही आता सामान्यांच्या आवाक्यात आली आहेत.

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’ विवेकवादी चिंतनाला वाहिलेले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विवेकाधीष्ठित विचारांना यात प्राधान्य असणे साहजिकच आहे. १८ डिसेंबरला ब्राइट्स सोसायटीने पुणे येथे ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’ आयोजित केली होती. परिषदेच्या पहिल्या भागात नास्तिकता, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि या सगळ्याला मिळणारे आणि मिळायला हवे असणारे कायद्याचे संरक्षण यावर आमंत्रितांची भाषणे झाली. तर दुसऱ्या भागात काही चर्चासत्रे त्यांनी घेतली. या साऱ्याचे समालोचन वाचकांपर्यंत पोहोचावे असे आम्हाला वाटले. ब्राइट्स सोसायटीचे सचिव कुमार नागे यांनी या अंकाच्या संपादनाची जबाबदारी घ्यावी असे आम्ही सुचवले. कुठलेही चांगले काम हे एकेकट्याने केले तर मोठे होत नसते.

पुढे वाचा

अविनाश पाटील ह्यांचे भाषण

‘ब्राइट्स सोसायटी’च्या वतीने आयोजित या नॅशनल एथिस्ट कॉन्फरन्सच्या उद्घाटनसमारंभाच्या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच इतर सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो कारण त्यांनी भारतीय सांवैधानिक व्यवस्थेने दिलेल्या अधिकाराला मूर्त स्वरूप दिलेले आहे. संस्थेची नोंदणी करून जे काही अधिकार, स्वातंत्र्य मिळवलेले आहे ते पुढच्या काळात ब्राइट्सच्या वतीने चाललेल्या, चालवायच्या कामाला एक मोठा अवकाश निर्माण करून देऊ शकेल. तो अवकाश काय असू शकतो? कदाचित ॲड. असीम आपल्याला सांगतील. पण एक महत्त्वाची पायरी आपण ओलांडली आहे आणि ती पायरी ओलांडल्यामुळे आता आपल्या संसदेला पर्याय म्हणून ‘धर्मसंसद’ उभी करणाऱ्यांनादेखील आपण ‘काटे की टक्कर’-अगदी कॉन्स्टिट्यूशनली आणि लीगली-देऊ शकतो; अनुषंगाने आपली पायाभरणी झाली आहे असं म्हणू शकतो आणि यासाठी पुन्हा एकदा ब्राइट्सच्या सात-आठ हजार सहकाऱ्यांचं, सदस्यांचं, हितचिंतकांचं अभिनंदन.

पुढे वाचा

अविनाश पाटील ह्यांच्या भाषणाचे समालोचन

डिसेंबर २०२२ च्या १८ तारखेला पुण्यातल्या गोखले सभागृहात राष्ट्रीय नास्तिक परिषद थाटात सम्पन्न झाली. परिषदेची सुरुवात अविनाश पाटील यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने झाली. अविनाश हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ब्राइट्सचे जुने स्नेही आणि सहयोगी आहेत. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर आपल्यातून हिरावले गेले, त्यावेळी बसलेल्या तीव्र धक्क्यातून आणि कठोर अग्निपरीक्षेतून बाहेर पडण्यासाठी अविनाश यांनी अंधश्रद्धांशी लढ्याचा अधिक तीव्र निर्धार केला. दाभोलकरांची हत्या ही कदाचित अजूनही त्याचा ‘तपास’ करणाऱ्या CBI साठी एक रहस्य असेल, पण जगभरच्या विवेकवादींसाठी ते तसे नाही.

पुढे वाचा

शिवप्रसाद महाजन ह्यांचे भाषण

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजच्या या ब्राइट्स सोसायटीच्या परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रविवारची सकाळ असूनदेखील सर्वांनी उत्साह दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. ब्राइट्स सोसायटीच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. जे अनेक विचारवंत, लेखक, मान्यवर यांची भाषणं ऐकत आणि व्हिडीओ पहात मी इथपर्यंत आलो आहे, ते बरेच मान्यवर समोर बसलेले पाहून थोडं दडपण येतं. तसचं दडपण मलाही आलेलं आहे. ब्राइट्स सोसायटीने आजपर्यंत अनेक परिषदा-मेळावे केलेले आहेत, अजूनही चालू आहेत. त्यांनी अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या, त्या प्रकाशित केल्या, पुस्तकसुद्धा प्रकाशित केलेलं आहे.

पुढे वाचा

असीम सरोदे ह्यांचे भाषण

कुमार नागे यांची एक वेगळी स्टाईल आहे, जी कोणालाही कॉपी करता येत नाही आणि अशी त्यांनी माणसं जोडलेली आहे. तर ही ताकद आणि सम्यक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषत: सामाजिक आणि रचनात्मक काम करताना. मंचावर उपस्थित मान्यवर आणि पुढे बसलेले मित्र-मैत्रिणींनो, मी आज काही महत्त्वाचं बोलणार आहे असं सांगितल्यामुळे खूप मोठी जबाबदारी येऊन पडते की महत्त्वाचंच बोलायला पाहिजे, त्यामुळे ते ऐकल्यावर तुम्हीच ठरवा की ते महत्त्वाचं आहे का? तर मागेही मी या विषयावर बोललो होतो, पण काही नवीन गोष्टी आहेत त्यांबद्दल उल्लेख करायला पाहिजे.

पुढे वाचा