विषय «इतर»

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सगळी चळवळ या विषयाभोवती फिरत असते. आणि ज्या काही शिव्या आणि ओव्या आम्हांला चळवळीमध्ये मिळत असतात, त्याचा याच विषयाशी संबंध असतो. काही जणांना असे वाटते, आमचे काम अयोग्य आहे, अनिष्ट आहे, अरास्त आहे. काही जणांना असे वाटते की, हे काम झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला देश २१ व्या शतकात पदार्पण करणार नाही. आणि काहीजणांना असे वाटते की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही देव, धर्म, परंपरा बुडवत आहोत. ते म्हणतात, ‘अंधश्रद्धा म्हणजे काय ? अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या निखाऱ्यावरची राख. राख उडवून लावली की आतला निखारा पुन्हा पूर्वीसारखा तेजस्वी होतो.

पुढे वाचा

अंधश्रद्धाः काही संकल्पना

आपण अंधश्रद्ध आहोत हे जवळपास कोणीच पटकन म्हणणार नाही. जरा खोलवर विचार केल्यावर कदाचित एक दोन बाबी मान्य केल्या जातील पण त्या तेवढ्याच. सर्वसाधारण अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्या कुणाची विचित्र समजूत असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. या सापेक्ष व्याख्येचा एक फायदा म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध सर्वांचे एकमत होऊ शकते! कारण दुसऱ्यांची अंधश्रद्धा दूर करणे हे प्रत्येकाचे स्वाभाविक कर्तव्य असते.
अंधश्रद्धा शब्द उच्चारला की साहजिकपणे मंत्र-तंत्र, शकुन-अपशकुन, फलज्योतिष्य, नवससायास, व्रतवैकल्ये अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात. या सर्वांना अंधश्रद्धा न म्हणता चिपळूणकरांनी ‘लोकभ्रम’ असा शब्दप्रयोग केला.

पुढे वाचा

भाग दोनः विवरणात्मक मंत्र, मांत्रिक व चमत्कारः

[प्रा. मच्छिन्द्र मुंडे (जन्म १९५८) अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन हजाराच्या आसपास व्याख्याने, प्रात्यक्षिके, सहा पुस्तकांचे लेखन, भोंदूबाबांची हातचलाखी ओळखण्यात हातखंडा व त्यामुळे पर्दाफाश करणे, भरपूर संघटनात्मक कार्य अशी त्यांची थोडक्यात ओळख आहे.] तुम्ही विवेकी कसे बनलात?
माझे लहानपण खेड्यात व घरच्या वारकरी वातावरणात गेले. डोंबिवलीजवळचे आगासन हे माझे गाव. माझ्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. हायस्कूल डोंबिवलीत आणि नंतरचे शिक्षण मुंबईत झाले. मी सातवीत असताना (१९७२ साली) आमच्या गावच्या शाळेत संपतराव कदम गुरुजी हे विवेकी विचाराचे शिक्षक तेथे बदलून आले.

पुढे वाचा

भविष्यकथन

भविष्याची चिंता मानवाला प्राचीन काळापासून सतावत आली आहे. त्यावर मात करण्यासाठी काळाच्या ओघात भविष्यकथनाच्या विविध पद्धतींनी आकार घेतला. या सर्वांचा उगम पुराणकाळात झाल्याचे दिसून येते. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा आदिमानव जसजसा निसर्गबदलांशी परिचित होऊ लागला तसतसा निसर्गाच्या अफाट सामर्थ्यात स्वतःला जुळवून घेण्यास शिकला. हे शिकत असताना निसर्गाच्या वर्तमान स्थितीतून अथवा बदलातून भविष्यातील सृष्टी आकार घेत असते हे त्याला समजू लागले. झाड फुलांनी बहरलं की काही दिवसांत झाडाला गोड फळे लागतात. मुंगीसारखे कीटक पृष्ठभागावर दिसू लागले की थोड्याच दिवसांत पाऊस येतो. विशिष्ट प्राणी दिसेनासे झाले की उन्हाळा सुरू होतो.

पुढे वाचा

भूत

आजचा सुधारकचा वाचक भुतां-खेतांवर विश्वास ठेवत असेल असे कुणी म्हणणार नाही. भूत का नाही? त्याच्या संदर्भातील गोष्टी किंवा घटना कश्या बनावट आहेत ? याची चर्चा करण्याचा प्रश्नही येथे उद्भवत नाही. परंतु ‘भूत’ हा विषय जितक्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे तितका तो गांभीर्याने घेतला जात नाही हेही तितकेच खरे. त्यामुळे ‘भूत’ म्हणजे पडक्या वाड्यात राहते, स्मशानात राहते अशा प्रकारची अंधश्रद्धा इतपतच माहिती सुशिक्षित समाज बाळगतो. फार फार तर लहान मुलांना घाबरवण्यासाठी ‘भूत’ ही कल्पना वापरली जाते. त्यामुळे भुताबद्दल बोलले की बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही ‘आहट’ वगैरे मालिकांविरुद्ध मोहीम सुरू करा.

पुढे वाचा

आधुनिक अंधश्रद्धा, दंतकथा, मिथके, इत्यादि

नवस, चमत्कार, मांत्रिक-तांत्रिक, ज्योतिषविद्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामी-महाराज, या अंधश्रद्धांच्या परिचित प्रकारांपलिकडे इतरही अनेक प्रकार आहेत. या प्रकारातल्या ‘अंधश्रद्धा’ समाजातील प्रचलित चालीरीती, रूढीपरंपरा, धार्मिक कर्मकांडे, यांच्याशी संबंधित नसतात. त्यांचा उगम तुलनेने अलिकडच्या काळात झालेला असतो. त्यातील अनेक समजुतींना ‘अंधश्रद्धा’ मानायला शिक्षित समाजही पटकन तयार होत नाही. या ‘आधुनिक’ अंधश्रद्धा कधी नवीन दंतकथांच्या स्वरूपात समोर येतात. तर कधी त्या मिथ्याविज्ञानाच्या बुरख्याआड दडलेल्या असतात. कधी त्या विशिष्ट उत्पादक-विक्रेत्यांनी पसरवलेल्या असतात, तर कधी, टीव्ही, इंटरनेट अशा आधुनिक प्रसारमाध्यमांद्वारे त्या पसरतात. विचारप्रणाली (ideology) म्हणजे एक ‘दृष्टिकोण’ असतो, ‘सत्य’ नव्हे, याचे भान सुटल्यामुळेही अनेक अंधश्रद्धा तयार होतात.

पुढे वाचा

धार्मिक अंधश्रद्धा धर्मः

अंधश्रद्धांचा एक मोठा स्रोत म्हणून धर्माकडे पाहता येते. बहुतांश अंधश्रद्धांचा धर्माशी संबंध दिसतो. धर्माचे वा धार्मिक अंधश्रद्धांचे तीन भाग करता येतात. परंपरागत, वैयक्तिक व संघटनात्मक असे ते तीन भाग करता येतील. प्रत्येक धर्माला मूलतत्त्व असते (जे विविध पंथांमध्ये समान असते पण दोन धर्मांत असमान असते). एक ज्ञानी वा पुरोहितवर्ग असतो आणि एक सामाजिक अस्तित्व असते. यातील मूलतत्त्व हे वैयक्तिक, सामाजिक हे परंपरात्मक तर पुरोहितवर्ग हे संघटनात्मक अशी वर्गवारी करता येईल. सर्वसाधारणपणे सुधारणा (अंधश्रद्धानिर्मूलन) या प्रथम सामाजिक वा परंपरागत नंतर पुरोहितवर्गविरोधी व शेवटी मूलतत्त्वविरोधी असतात.

पुढे वाचा

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींचा वेध

भाग तीनः कार्यकर्ते : व्यक्ती व संघटना
१९६७ ते १९८० दरम्यान आर्थिक, राजकीय घडामोडींना वेग आला होता. तरुणांची आंदोलने होत होती. नक्षलवादी चळवळीचा उगम, बिहार व गुजरातमधील आंदोलने याच काळातली. महाराष्ट्रात अशा अस्वस्थतेबरोबर, तरुण दलितांची चळवळ दलित पँथर, सामाजिक बदलाची चळवळ युक्रांद यांचे वारे वाहत होते. १९७४ मध्ये वरळीत दलित-सवर्ण दंगा झाला, यापुढे काहीच महिन्यांत दलित युवकांनी मराठवाड्यात सरकारी यंत्रणेविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. विविध पुरोगामी चळवळी यावेळी कार्यरत होत्या. ज्यांतील काही नावे पुढीलप्रमाणे : रॉयिस्ट, राष्ट्र सेवा दल, सर्वोदयी, सत्यशोधक समाज, आंबेडकरांचे अनुयायी, भूमिसेना, ग्रामस्वराज्य समिती, मागोवा, शहादा तळोदा गट, छात्र युवा संघर्ष वाहिनी, यूथ ऑर्गनायझेशन, क्रांतिकारी महिला संघटना.

पुढे वाचा

जोतीराव फुले यांचे अंधश्रद्धा-निर्मूलन कार्य

जोतीराव फुले यांनी विश्वमानवाच्या मुक्तीसाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या दोन निष्ठावंत अग्रणींच्या आयुष्यातील दोन प्रसंग प्रारंभीच नमूद केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्या चळवळीने संपादन केलेल्या यशाचा प्रत्यय येऊ शकेल. पहिला प्रसंग ना. भास्करराव जाधवांच्या आयुष्यातला आहे. वेदोक्त प्रकरणी दुखावलेल्या शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्र जगद्गुरूची प्रतिष्ठापना केली तेव्हा भास्कररावांनी त्या कल्पनेस विरोध केला होता. एवढेच नव्हे तर महाराजांसह सर्व श्रेष्ठींनी क्षात्रजगद्गुरूंना अभिवादन केले तेव्हा, आपण सत्यशोधक असल्यामुळे कोणत्याही धर्मपीठापुढे नतमस्तक होणे आपल्या विचारांत बसत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. सत्यशोधकी विचार केवळ ब्राह्मणी जगद्गुरूंनाच नकार देत नसून संपूर्ण पुरोहितशाही आणि जन्मनिष्ठ विषमतेवर आधारित वर्णव्यवस्था यांनाच नाकारतो.

पुढे वाचा

गाडगे महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य

गाडगे महाराजांना संत का म्हटले गेले हेच कोडे आहे. रूढार्थाने आपण ज्यांना संत म्हणतो, त्या संतांसारखी एखादीही कृती गाडगेबाबांनी केली नाही. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला आपण ‘बाबा’ म्हणतो या अर्थाने खेडुतांनी, गोरगरिबांनी त्यांना बाबा म्हटले आणि ते त्यांनी सहर्ष स्वीकारले असावे. पण महाराज ? हे काय प्रकरण आहे? कुणी आपल्या सोयीसाठी त्यांना महाराज बनविले ? कारण त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितले आहे ‘मी कोनाचा गुरु नाही अन् माझे कोनी शिष्यई नाहीत-‘ आपल्या भोवतीच्या सामाजिक दुःस्थितीचे अवलोकन करीत, त्यातून मार्ग शोधीत गाडगेबाबांचे लोकोत्तर आणि इहवादी तत्त्वज्ञान आकारले आहे, हे कुणी लक्षातच घेत नाही.

पुढे वाचा