विषय «इतर»

चित्रपट-परीक्षण : नटरंग : नाच्याच्या जीवनाची शोकांतिका

आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ या ग्रामीण कादंबरीवर प्रदर्शित झालेला चित्रपट, तमाशा कलावंतांच्या जीवनाची शोकांतिका मांडतो. तमाशाकडे आजही टाकाऊ कला म्हणून पाहिले जाते. त्यात काम करणारे कलावंत उपेक्षित राहतात. त्यांची भटकंती चालूच असते. या कला व कलावंतांकडे बघण्याची दृष्टी बदलावी, असा संदेश हा चित्रपट देतो.

बाळू मांगाच्या पोटी जन्मलेला गुणा हा तमाशाच्या वेडाने झपाटलेला आहे. तमाशात राजा होऊन झकास वग लावावा, आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करावे, हे त्याचे स्वप्न असते. परंतु त्याला नाच्या व्हावे लागते. नाच्या म्हणून त्याला लोकांनी स्वीकारल्यानंतर ते त्याला अर्जुनाच्या भूमिकेत स्वीकारत नाहीत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

संजीवनी चाफेकर, ब-5, सुहृद सोसायटी, मेहेंदळे गॅरेजसमोर, एरंडवणे, पुणे 411004. Sanjeevani@gmail.com ज्या स्त्रियांवर बाळंतपण लादलेले असते (मग त्या विवाहित असोत किंवा बलात्कारित) त्या स्वतःच्याच (जनुकीय) अपत्याच्या सरोगेट मदर (सेल्फ सरोगसी) नव्हेत काय? लादलेले गर्भारपण असले तर, केवळ बीज स्वतःचे आहे म्हणून त्याविषयी आत्मीयता वाटणार नाही. भारतासारख्या देशात अशा गुलामी/दास्याने पीडित असणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत. सँडेल यांना कदाचित ही परिस्थिती माहीत नसावी. त्यामुळे ते दासी / गुलाम म्हणून अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या सेल्फ सरोगेटचा विचार न करता फक्त करारान्वये सरोगसी करणाऱ्या स्त्रियांविषयी भाष्य करत आहेत.

पुढे वाचा

अणुकचरा

[ अणुऊर्जा नेहेमीच वादग्रस्त राहिली आहे. ती तयार करायला लागणारे पदार्थ आणि तंत्रज्ञानच अणुबॉम्ब तयार करायलाही लागतात. त्यामुळे जबाबदार देशांना आपले अणुऊर्जा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय तपासण्यांसाठी खुले करावे लागतात. यामुळे होणारा सार्वभौमत्वाचा संकोच, यावर मोठाले वाद झडतात. अणुऊर्जा बनवण्याशी संबंधित तंत्रज्ञान नवे व्यामिश्र आणि उच्च प्रतीचे विज्ञान वापरणारे असते. त्यामुळे ती बनवायला तज्ज्ञ तंत्रज्ञ घडवण्यापासून सुरुवात करावी लागते. त्या ऊर्जाउत्पादनात काटकसर, तंत्रज्ञानाबाहेरचे घटक, घाईगर्दी, यांना थारा नसतो. जर अशा गोष्टींना वजन देत स्थळकाळ वा खर्चाचा अयोग्य संकोच केला गेला, तर अपघात होऊ शकतात, व ते भीषण असू शकतात.

पुढे वाचा

अणुकचरा आणि जैतापूर प्रकल्पः वास्तव व त्यासंदर्भातील एकवीस वैज्ञानिक प्रश्न

दै. लोकसत्ता दि.२१ जुलै २०१० मध्ये माजी शास्त्रज्ञ रवींद्र काळे यांनी ‘अणुकचरा : भीती व वास्तव’ हा लेख लिहिला आहे. या विषयावर वैज्ञानिक चर्चा होणे, विशेषतः जैतापूरच्या संदर्भाने, हे खरोखरच अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीच्या काळात भारताच्या अणुकार्यक्रमाबाबत काटेकोर व परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा गुप्ततेच्या कारणांमुळे कधीच होऊ शकली नाही हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जैतापूर हा नागरी ऊर्जाप्रकल्प आहे आणि त्यामुळे त्यात गुप्ततेची आवश्यकता नाही. अशा प्रकल्पांबाबत गुप्तता राखणे हे लोकहिताचेही नाही. अशा कोणत्याही प्रकल्पाच्या सर्व अंगांबाबत परिपूर्ण वैज्ञानिक चर्चा झाल्याशिवाय असा प्रकल्प पुढे जाणे देशहिताचेही नाही.

पुढे वाचा

हिमालय वितळतो आहे

डेव्हिड ब्रीशीअर्स (D. Breashears) पाचदा एव्हरेस्ट चढून गेला आहे. १९८३च्या पहिल्या चढाईनंतर प्रत्येक फेरीत त्याला भूचित्रबदल आणि हिमनदांचे आकुंचन जाणवू लागले. जुनी छायाचित्रे आणि ताजी छायाचित्रे यांची तुलना करताना हिमनदांची प्रचंड पीछेहाट दिसू लागली. १९२१ साली जॉर्ज मॅलरीने घेतलेल्या एका छायाचित्राची (मॅलरीने छायाचित्र घेतले तिथूनच) नवी आवृत्ती हिमनद शंभर मीटर मागे गेल्याचे दाखवते. ब्रीशीअर्स आता यावर लक्ष ठेवण्यासाठी खास उपकरणे बसवत आहे.
जागतिक तापमान मोजायला १८८० पासून सुरुवात झाली. नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते जानेवारी-जून २०१० हा १८७० पासूनचा सर्वांत गरम काळ होता.

पुढे वाचा

सूर्यकुलातील लोक

सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत अजून तुझी आवराआवर झाली का नाही ? ह्या एकोणीस ठिगळांचा आता कशाला विचार ? अजून तुझी फुले माळून झालीत का नाही ? कशाला हवे कोठीला टाळे ? उघडीच ठेव दारे अजून तुला इथला मोह सोडवत का नाही? ते रुद्राक्ष, पोथ्या, ते खुंटीवर टांगलेले देव कालच म्हणालीस “कुणीही भले केलेले नाही.” मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार : “सूर्यकुलांतील लोकांना थांबणे माहीत नाही.” खाली कशासाठी हवे नाव ; निनावे म्हणतील म्हणून आपल्या हातांचे ठसे पुरेसे का नाहीत?

पुढे वाचा

राजकारणातील नैतिकता

मूळ लेखक : मायकेल सँडेल

रीथ व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान राजकारणातील नैतिकता (Morality in Politics) ह्या विषयावर होते. व्याख्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रसारित करण्यात आले; जिथे मायकेल सँडल होड्स् स्कॉलर म्हणून काही काळ राहिले होते. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेले सत्य आणि धैर्य (Truth and Courage) हे गुण असलेल्या विद्यार्थ्यांना होड्स् स्कॉलरशिप दिली जाते. समाजाबाबत नागरिकांची कर्तव्ये कोणती हाच सँडल ह्यांच्या व्याख्यानमालेचा गाभा असल्याने ऑक्सफर्डच्या ‘होड्स् हाऊस’मधून त्यातील एक व्याख्यान प्रसारित होणे उचित होते.

सुरुवातीच्या प्रास्ताविकात स्यू लॉली ह्या संयोजिकेने सँडल लॉस एंजलीसमध्ये शाळेत शिकत असताना घडलेली एक घटना सांगितली.

पुढे वाचा

एक साक्षात्कारी अनुभवकथन

साहित्यिक असो वा कलावंत असो, त्यांच्या प्रतिभेची किंवा सृजनाची निर्मिती कुठून होते ? ज्या मेंदूमुळे आपल्याला खरेखुरे माणूसपण लाभलेले असते त्या मेंदूतच जर काही बिघाड झाला तर कसली कला आणि कसले साहित्य! हा विचार मनात येताक्षणीच मी अलीकडे वाचलेले एक पुस्तक नजरेसमोर आले.
स्वतः ‘न्यूरोसायंटिस्ट’ असणाऱ्या सदतीस वर्षांच्या एका स्त्रीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव होऊन अवघ्या चार तासांत तिची दारुण अवस्था होते. त्या अवस्थेत तिने जे चित्रविचित्र अनुभव घेतले, स्वतःला निकामी होण्यापासून वाचवण्याची जी धडपड केली ती इतरांनी समजून घेतली तर ते वेगळीच सावधगिरी बाळगून स्वतःला वाचवू शकतील, या तळमळीतून साकारली गेलेली एक विलक्षण साहित्यकृती म्हणजे डॉ.

पुढे वाचा

मनोगतः ‘मेंदूतला माणूस’ विषयीचे

‘मेंदूतला माणूस’ हे डॉ. जोशी आणि श्री जावडेकर ह्यांचे पुस्तक वैद्यकीय, वैज्ञानिक तसेच मानवीय अभ्यासशाखांमध्ये क्रांती घडवून आणणारे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात, मानसशास्त्र आत्मा, मन आणि त्यानंतर जाणीव (Consciousness) इ.चा अभ्यास करीत असे. नैसर्गिक विज्ञानांच्या प्रसारानंतर, शास्त्राचा अभ्यासविषय निरीक्षणक्षम असला पाहिजे, हे लक्षात घेऊन मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हापासून आजवर मानसशास्त्राने बरीच प्रगती केली आहे. तथापि स्मृती, अवधान, कल्पन, भावना, विचार इ. मानवी प्रक्रिया निरीक्षणक्षम नसल्याने त्यांच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात अडचणी जाणवू लागल्या. ते मनाचे व्यापार समजले जात.

पुढे वाचा

दोन्ही गोष्टी

सर्व संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो जगण्याचा. सर्व सामाजिक संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो इतर संरचनांशी जुळते घेण्याचा. आणि एका मर्यादेपर्यंत सर्व संरचना सामाजिकच असतात. आपण जिला नीतिमत्ता म्हणतो, जीनुसार आपण वागणुकीचे नियम ठरवतो, त्या कल्पनाव्यूहात वरील दोन्ही गोष्टी येतात. व्यक्ती म्हणून स्वतःसाठी जगणेही येते, आणि इतर व्यक्तींसाठी करण्याची कर्तव्येही येतात. या इतर व्यक्तींमध्ये आपला समाज, आपली जीवजात, इतर जीवजाती, हे सारेच येते. [ कॉलिन टज्च्या सो शल वुई रीप (अॅलन लेन, २००३) या पुस्तकातील बायॉलजी, मोरॅलिटी, एस्थेटिक्सः द मीनिंग ऑफ अॅग्रिकल्चर या प्रकरणातून.]

पुढे वाचा