डॉ. प्रदीप पाटील यांनी (आजचा सुधारक मे-जून ९२) उपस्थित केलेल्या तेरा मुद्द्यांसंबंधी लिहिण्याची सुरुवात शेवटल्या वाक्यातील वैज्ञानिक’ या शब्दापासून करतो.
तंत्रवैज्ञानिक मार्ग वा उपाय म्हणजे काय हे चटकन कळते. वैज्ञानिक मार्ग म्हणजे काय?
आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या मर्यादेत बोलावयाचे तर भौतिक जगाविषयीचे एका विशिष्ट प्रकारचे ज्ञान म्हणजे (आधुनिक पाश्चात्य) विज्ञान होय. हे ज्ञान पक्के असते व ते स्थलकालनिरपेक्ष (युनिव्हर्सल) असते. या ज्ञानाचा उपयोग करून एखादा प्रश्न सोडवला गेल्यास वैज्ञानिक मार्गाने प्रश्न सोडविला असे म्हणता येईल. मग वैज्ञानिक = तंत्रवैज्ञानिक असे समीकरण होईल.
विषय «इतर»
चर्चा -गीता, मनुस्मृति व प्राध्यापक देशपांडे
ऑगस्ट ९२ च्या आजच्या सुधारकमध्ये प्रा. देशपांडे यांनी त्यांच्या गीतेवरील लिखाणावर मी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर दिल्याचा दावा मांडला आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे गीतेने नीतीच्या मूलभूत प्रश्नांना बगल दिलेली नसून देशपांड्यांनी मात्र माझ्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिली आहे. दोन कर्तव्यांत संघर्ष कसा टाळावा या प्रश्नाचे उत्तर त्यांना गीतेत सापडत नाही, मी दाखवून दिल्यावरही सापडत नाही. दुष्टांना शासन करण्यासाठी युद्ध करणे व शासनयोग्य स्वजनांना शासन न करता, आपण स्वजनांवर हात उगारला नाही याचे समाधान मिळविणे या दोन कर्तव्यांत अर्जुनापुढे संघर्ष होता. या संघर्षाची सोडवणूक गीतेने ‘लोकसंग्रह व ‘सर्वभूतहित’ हे दोन नीतीचे उद्देश सांगून केली आहे.
पुस्तक परिचय -सावरकर ते भाजपः हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख
सावरकर ते भा. ज. प. हा ग्रंथ छोटेखानी दिसत असला तरी त्याचा आवाका मोठा आहे. किमान १९२० पासून १९९२ पर्यंत म्हणजे अंदाजे सत्तर-पंचाहत्तर वर्षांचा कालखंड त्यामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. भारताला भेडसावणाच्या मुस्लिम प्रश्नाचे त्यामध्ये केलेले चित्रण बरेचसे यथातथ्य आहे. काही ठिकाणी मात्र थोडे जास्त अतिसामान्यीकरण (overgeneralization) झाल्यासारखे वाटते.
ग्रंथाची रचना बांधेसूद आहे. लेखकाने त्याचा आरंभ मुस्लिम प्रश्नापासून करून आपल्या प्रतिपाद्य विषयाचा भरभक्कम पाया रचला आहे. हिन्दुराष्ट्रवाद किंवा हिंदुत्व हा विचार मुख्यतः मुसलमानांकडून (आणि गौणतः ख्रिश्चनांकडून) होणार्यार आक्रमणाची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाला आहे आणि आजही त्याचा मुख्य संदर्भ मुस्लिम प्रश्नाचाचआहे असे लेखकाचे मत आहे.
डॉ. नी. र. वर्हाडपांडे यांच्या आक्षेपांविषयी
माझ्या ‘गीतेतील नीतिशास्त्र या लेखावर डॉ. नी. र. वर्हाडपांडे यांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. (आजचा सुधारक, मे-जून ९२, पृ. ८५) त्यांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. त्यांचा पहिला मुद्दा असा आहे.‘गीतेचे विवेचन महाभारताच्या पाश्र्वभूमीचा विचार केल्याशिवाय योग्य रीतीने होऊ शकत नाही. गीतेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर नाही असे प्रा. देशपांडे म्हणतात. या आरोपाची चिकित्सा करण्यासाठी अर्जुनाचा प्रश्न काय होता हे समजून घेतले पाहिजे. ‘कर्तव्य कोणते हे कसे ठरवावे?’ आणि ‘ युद्ध न्याय्य की अन्याय्य याचा निकष कोणता?’ या मूलभूत प्रश्नांची चर्चा महाभारतात इतरत्र आलेली आहे व गीतेच्या नीतिशास्त्रविषयक विचारात ती गृहीत धरलेली आहे.’
उपेक्षा लोकहितवादींची
महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ (इ.स. १८३२) या साप्ताहिकाच्या आरंभापासून झाला असे म्हणता येईल. परंतु सामाजिक सुधारणेला पोषक व प्रेरक असे साहित्य ‘प्रभाकर’ पत्रातून १८४६ सालापासून ‘शतपत्रां’च्या रूपाने महाराष्ट्राला दिले ते लोकहितवादी यांनीच. त्याच वर्षी पुण्यात पहिली मुलींची शाळाकाढून म. जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षात सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. पेशवाईच्या अस्तानंतर केवळ तीस वर्षांच्या कालावधीत हे सारे घडून आले. इंग्रजी राज्य हे शाप की वरदान याचा निर्णय होण्यापूर्वीच हे घडून गेले. या परिवर्तनाची कल्पना व योजना ज्या त्रिमूर्तीनी केली ते तिघेही तरुण होते.
शेअर बाजारातील अभूतपूर्व घोटाळा
गेल्या काही महिन्यांत शेअरबाजारातील व बँकांसारख्या वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहारांसंबंधीच्या बातम्यांनी खळबळ माजली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणून ह्याची नोंद केली जाईल असे म्हटले जाते. ‘शेअर बाजारातील महाबेलाचा धुमाकूळ’ इ. मथळ्यांखाली हर्षद मेहता, त्याचे साथीदार व काही अग्रगण्य देशी व विदेशी बँका यांच्या गैरव्यवहारासंबंधी वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. ह्या बातम्यांनी सर्वसामान्य माणूस संभ्रमित झालेला दिसतो. ह्या प्रकरणातील आर्थिक व्यवहार बरेच गुंतागुतीचे आहेत. तरी पण या घोटाळ्याची स्थूल मानाने कल्पना यावी या उद्देशाने केलेला हा लेखनप्रपंच.
ग्रामीण महिलांच्या गंभीर लैंगिक व मानसिक समस्या
आरोग्यसेवेचे फायदे घेण्यासाठी स्त्रिया पुढे येऊ शकत नाहीत यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही. भारतीय आरोग्यसेवा पद्धतीत स्त्रीला फक्त माता किंवा भावी माता एवढ्याच स्वरूपात स्थान दिले जाते. ही या पद्धतीतील महत्त्वाची त्रुटी आहे. ही विचारसरणी जनारोग्य चळवळीतील पुरोगामी व्यक्तींनीसुद्धा कमी अधिक प्रमाणात स्वीकारलेली आढळून येते. माता-आरोग्य-संवर्धन या कार्यक्रमाचे फायदे गरीब, कामकरी महिलांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांप्रर्यंत परिणामकारक रीत्या पोहचू शकत नाहीत.
सार्वजनिक आरोग्य सेवेत, स्त्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने, महिला आरोग्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. जननक्षमता, तसेच अपत्यजन्माशी थेट संबंध नसलेले प्रश्न, सोयिस्करपणे वळचणीला टाकले जातात.
विवाह आणि नीती
बहुजनसमाजास ही नीती अजून कळू लागली नाही, व केवळ विवाहबाह्य समागम म्हणजेच अनीती अशी त्याची समजूत आहे. शास्त्रीयदृष्ट्या विवाहाचा व नीतीचा बिलकुल संबंध नाही; किंबहुना विशिष्ट वयोमर्यादेपुढे पत्नीवर बळजबरी करण्याचा कायदेशीर हक्क पतीस असल्यामुळे, व विवाहबाह्य समागमात बळजबरी कायदेशीर नसल्यामुळे विवाह हीच कायदेशीर अनीतीस सवड आहे. तथापि धार्मिक वेडगळांस हे कळत नाही, व विवाहबाह्य समागम करणारांस सामाजिक त्रास होण्याची खात्रीच असते; कारण समाज कितीही दुबळा असला तरी त्रास देण्याची शक्ती त्याला असते. अर्थात् यामुळे विवाहबाह्य समागम किंवा व्यभिचार बंद झालेला नाही, मात्र तो समाजाच्या नजरेस येणार नाही अशी खबरदारी लोक घेतात इतकेच …… अशा वेळी समागम करणार्या पुरुषाच्या पदरात अनीती येते, कारण त्यापासून अशा स्त्रीची समाजात फजीती होईल, इतकेच नव्हे तर तिचे उपजीविकेचे साधन नाहीसे होऊन तिच्यावर वेश्यावृत्तीचा प्रसंग येईल…….
धर्म वेगळा, रिलिजन वेगळा
भारतीय संविधानानुसार भारत हे जसे लोकशाहीप्रधान राज्य तसेच ‘सेक्युलर’ म्हणजे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य आहे. इंग्रजी भाषेतील ‘रिलिजन’ला समानार्थी शब्द म्हणून ‘धर्म’चा वापर करण्यात येतो. ‘धर्म’ व ‘रिलिजन’ या संकल्पना एक नव्हेत. ‘सेक्युलर म्हणजे ‘रिलिजन’निष्ठ राज्य नाही; तर धर्मप्रधान राज्य होय. परंतु ‘धर्म व रिलिजन’ यांचा समानार्थी वापर केल्यामुळेच ‘सेक्युलर’चा देखील चुकीचा अर्थ लावण्यात आला हे यथामति सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
जो राजकीय पक्ष संविधानाशी एकनिष्ठ नाही, त्यास निवडणुकांत भाग घेता येणार नाही. निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक भावनेस आवाहन करून प्रचार केल्याचे सिद्ध झाल्यास न्यायालय विजयी उमेदवाराची निवड रद्द करू शकते.
परिणामशून्य होमिऑपथी
१८ व्या शतकाच्या शेवटी सॅम्युएल हानेमान या जर्मन डॉक्टरने होमिऑपथीचे मूळ तत्त्व सुलभ रूपात मांडण्यास सुरुवात केली. त्याच्या काळातील प्रचलित वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये जळवा लावणे, कोठा साफ करणे व इतर उपचार यांनी लाभ होण्याऐवजी हानीच जास्त व्हायची. हे पाहून खरे तर हानेमान व्यथित झाले होते. मयुरी क्लोराईडसारख्या औषधामुळे होणार्या विषबाधेची त्यांना चिंता वाटत असे. त्यांनी नंतर समानांचा नियम” (Law of Similars) विकसित केला – रुग्णाच्या लक्षणांसारखी लक्षणे उत्पन्न करणारे औषध अल्प प्रमाणात देऊन रोगाचे निर्मूलन करणे. Let likes be treated by likes.