[ बाईचे बाईपण, तिचे भोग, दुःख ह्या सर्वांचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने त्या अर्थाच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न. – संपादक ]
माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं
– बहिणाबाई (1880-1951)
स्त्री-पुरुष हे शब्द नेहमीच फारच सैलसर अर्थाने वापरले जातात. ते जरा नीटस अर्थाने वापरले गेले तर त्यांच्या उपयोजनातील संकल्पनात्मक गोंधळ संपण्याची शक्यता असतेच पण जरा शिस्तबद्धताही येते.
‘स्त्री’ला मराठीत पर्यायी शब्द आहे महिला, वनिता, बाई, इ. अनेकवचन बायका, बाया. हिन्दी/उर्दूमध्ये औरत, लौंडी इ.
विषय «इतर»
साहित्यातून विवेकवाद (२) – जॉर्ज ऑर्वेल
स्टाईनबेकसारखाच 1902 साली जन्मलेला एरिक ब्लेअर. वडील बंगालात एक्साईज खात्यात होते. स्पष्ट सांगायचे तर अफूचे पीक नियंत्रित करणाऱ्या खात्यात होते. मुलगा शाळेत जायच्या वयाचा झाल्यावर इंग्लंडमध्ये निवासी शाळा शोधल्या गेल्या. त्या काळची इंग्रजी शिक्षणव्यवस्था ग्रामर म्हणजे प्राथमिक शाळा, प्रेपरेटरी किंवा प्रेप शाळा या माध्यमिक, आणि चांगल्या उच्चशिक्षणासाठी पब्लिक स्कूल्स. खरे तर पब्लिक स्कूल्स अत्यंत प्रायव्हेट आणि महाग असायची. त्यातूनही जरा चांगल्या, ख्यातनाम पब्लिक स्कूल्समध्ये प्रवेश कठीण असायचा, आणि शिष्यवृत्त्या आणिकच अवघड. मध्यम दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याच्या मुलाला शिष्यवृत्ती नसली तर सामान्य, अनिवासी प्रायव्हेट शाळा हाच पर्याय; अत्यंत असमाधानकारक, पण एरिक हुषार होता.
पुस्तकपरिचय पंडित-सुधारक : श्री. म. माटे (1006-1957)
प्रोफेसर माटे यांचा जन्म १८८६ साली दिगंबर-श्वेतांबरी जैन यांचे तीर्थक्षेत्र असलेलया वाशिम जिल्ह्यातील शिरपर (जैन) येथे व्हावा हा विलक्षण योगायोग मानला पाहिजे. कारण जैन तत्त्वज्ञान तत्त्वतः वर्णव्यवस्थेविरुद्ध असलेले वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिकदर्शन. प्रोफेसर माटे यांचे जीवितकार्य अस्पृश्योद्धार. त्यांनी अस्पृश्य-दलितांसाठी शाळा चालविल्या; त्यांना आरोग्याचे धडे दिले; त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची प्रसंगी व्यवस्था केली. त्यांच्या व्यथेला वाचा फोडणारे उपेक्षितांचे अंतरंग ही व्यक्तिचित्रे सादर केली. त्यामध्ये ‘बन्सीधरा तू कोठे जाशील’ यासारखी हृदयद्रावक कथा लिहिली. बहुतांची अंतरे राखून अस्पृश्योद्धाराचे कार्य केले म्हणून त्यांना बहुधा सनातनी सुधारक म्हणत असावेत.
हिंदुधर्म आणि हिंदुत्व
(सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता) हे विसाव्या शतकाने जगाला दिलेले मूल्य. ‘आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत’ असे संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केले आहे. इहवाद हा सेक्युलॅरिझमचा एक अर्थ असला, तरी, सामाजिक जीवनात धर्म न आणणे, सामाजिक व वैयक्तिक जीवन त्या अर्थाने परस्परमुक्त ठेवणे हा त्याचा खरा अर्थ होता. धर्मनिरपेक्षता ही आतापर्यंत पुरोगामित्व व विवेकवाद ह्यांची खूण समजली जात असे. धर्मचिकित्सेपासूनच सर्व चिकित्सांची सुरुवात होते असे मानण्यातून ह्या संकल्पनेची सुरुवात झाली. आता मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन, त्या शब्दाचा आजचा अर्थ, व्यक्तिगत जीवनातही धर्माचे पालन न करणे असा झाला आहे, कारण, पुरोगाम्यांच्या मते धर्मापासून मुक्ती ही सामाजिक जीवनाची पूर्वअट मानली जाते.
पत्रसंवाद
दत्तप्रसाद दाभोळकर, ‘या’ सदर बझार, सातारा. स्थिरध्वनी (02162)239195), भ्रमणध्वनी : 9822503656 id : dabholkard@dataone.in .
सूर्यापोटी शनैश्वर…? पण कोण…?
आजीव वर्गणीदारांची व्यथा मांडणाऱ्या माझ्या पत्राची खिल्ली उडवीत मला तर्कट तिरकस भाषेत दिलेले आपले उत्तर (आ.सु.494, फेब्रुवारी 2012) वाचले. आम्ही संपादक आहोत. मासीक आमचे आहे. तुमचे पैसे बुडवून वर आम्ही, तुमचीच आमच्या मासीकात खिल्ली उडव शकतो हा तमचा अहंकार मी समजू शकतो. पण रस्त्यावरचे गंड ज्याप्रमाणे आई, वडील, जात यांचा उद्धार करीत एखाद्यावर हल्ला करतात. त्याप्रमाणे माझे कुटुंब, परिवार यांचा उद्धार आपण करावयास नको होता.
सभ्यता आणि सुधारणा
सभ्यता आणि सुधारणा
आपण सभ्यता हे नाव कोणत्या स्थितीला देण्यात येते त्याचा विचार करू. ह्या सभ्यतेची खरी ओळख अशी आहे की लोक बाह्य वस्तूंच्या शोधात आणि शरीरसुखात सार्थकता मानतात. त्याची काही ‘उदाहरणे पाहू. एखाद्या देशाची माणसे समजा पूर्वी जोडे वापरीत नव्हती आणि आता युरोपचा जामानिमा करायला शिकली, तर ती जंगली अवस्थेतून सुधारलेल्या अवस्थेत आली असे मानले जाते. पूर्वी युरोपात माणसे सामान्य नांगराने आपल्यापुरती जमीन अंगमेहनतीने कसत असत त्याऐवजी आता वाफेवर चालणाऱ्या यंत्रांच्या नांगराने एक मनुष्य पुष्कळ जमीन कसू शकतो आणि पुष्कळ पैसा साठवू शकतो.
जगविस्तीर्ण मन : मानवता, यंत्र आणि आंतरजाल एकत्रित करणारे
World Wide Mind : The coming integration of humanity, machines and the internet लेखक मायकेल कोरोस्ट (प्रकाशक फ्री प्रेस, 2011) हे पुस्तक हल्ली वाचले. मेंदूतील प्रक्रियांचा शोध आणि त्याचा होऊ घातलेला परिणाम या विषयावर हे पुस्तक आहे.
गेल्या वर्षी, ‘आता यंत्रे मन ओळखू शकणार’ अशी बातमी वृत्तपत्रांतून आली होती. काही वृत्तपत्रीय अग्रलेखही त्यावर आले होते. हे यंत्र मनातलेच ओळखणारे असल्याने थापा मारणे दुरापास्त होईल असे काहीसे त्यावर लिहिले होते. यंत्र पुढील काही वर्षांत तयार होईल अशी ती बातमी होती. मेंदूतून विविध विद्युतचुंबकीय लहरी निघत असतात.
विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-३)
आजच्या विकासाच्या प्रतीकचिह्नांना विकासाचे लक्षण न मानता त्यांच्यामागचे सत्य तपासून पाहणे का गरजेचे आहे हे आपण मागच्या दोन लेखांत पाहिले. प्रतीकचिह्नांच्या मागचे सत्य शोधणे म्हणजेच आजच्या विकासाच्या मानचिह्नांबद्दल मूलभूत प्रश्न उभे करणे. असे करण्यामागील एक महत्त्वाचे कारण, या विकासासाठी आवश्यक असलेली साधने आपल्याला पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणार आहेत का, त्या साधनांचा उपयोग आपल्याला प्रमाणाबाहेर करावा लागणार आहे का, अशा प्रकारचे मोठे प्रश्न आपल्या मनात उभे ठाकलेले आहेत.
नैसर्गिक साधनांच्या उपयोगावर येणाऱ्या मर्यादा
नैसर्गिक साधनांच्या उपलब्धतेला काही सीमा आहेत का, असा प्रश्न विचारात घेताना आपल्यासमोर सर्वसामान्यपणे असते ती भौतिक मर्यादा.
संगीतातील ‘श्रुति’प्रामाण्याचा वैज्ञानिक उलगडा
[विवेक चिंतनाच्या वाटेवर संगीताचा विचार कुठे आला असा प्रश्न काही वाचकांना पडेल, आणि ते साहजिकही आहे. सुंदरता हे बघणाऱ्या/ऐकणाऱ्या इ. च्या ज्ञानेंद्रियांच्या समजुतीचेच केवळ फलित असते की एखादी गोष्ट वा परिस्थिती आस्वादकनिरपेक्षही सुंदर असू शकते, हा प्रश्न सौंदर्यशास्त्राने निश्चितच हाताळलेला असला तरी आस्वादकासाठी त्याची जाणीव समजुतीने येतेच असे नाही. शब्दांच्या वाटेने येणाऱ्या लेखन, नाट्य यांसारख्या कलांबाबत आपल्याला अमुकतमुक का आवडले, किंवा का सुंदर वाटले नाही याबद्दलचे प्रश्न विचारता येतात आणि त्यावर उत्तर मागता, येते, पण संगीतासारख्या गोष्टीत सूर-सौंदर्याचा आस्वाद देणाऱ्यांपैकी, त्यातील शार फारसे वा न शिकलेल्या बहुतांशी श्रोत्यांना, हे सूर आपल्या कानांना सुंदर भासले में जाणवते, पण असे का झाले याचा उलगडा होत नाही.
मानवी अस्तित्व (१)
आपण कुठून आलो?
आफ्रिकेच्या दंतकथेनुसार माणसे मध्य आफ्रिकेतून आली. मानवी अस्तित्वापूर्वी येथे फक्त अंधार होता व सर्व पृथ्वी जलमय होती. बुबा नावाचा देव होता. एके दिवशी बुंबाचे पोट अचानकपणे दुखू लागले. वेदना थांबेनात. शेवटी त्याला उलट्या होऊ लागल्या. वांतीतून सूर्य बाहेर पडला. सूर्याच्या तापमानामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर झाले. त्यामुळे जमिनीचा काही भाग दिसू लागला. तरीसुद्धा बुंबाची पोटदुखी थांबली नाही. पुन्हा एकदा उलटी झाली. त्यातून चंद्र, नक्षत्र, तारे बाहेर पडले. त्यानंतरच्या उलटीतून वाघ, सिंह, मगर, कासव व शेवटी माणूस असे बाहेर पडले आणि सर्व भूभागावर व जलमय प्रदेशात विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, झाडे दिसू लागली.