प्रा. दि. य. देशपांडे यांनी आजचा सुधारकच्या सप्टेंबर आणि आक्टोबर १९९२ च्या अंकांतून क्रमशः विवेकवादातील नीतिविचाराच्या त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याची बरीच खटपट केली आहे. त्या उत्तरांवरून विवेकवादाच्या नावाने पर चात्त्य विचारांनी भारलेल्या भारतीय विद्वानांनी भारतीय नीतिविचारांना उपहसत जे तर्क कौशल्य दाखविण्याची धडपड चालविली आहे, ते मुळात किती कच्चे, अपुरे आणि भ्रामक आहे याची साक्ष पटते. एक गोष्ट प्रथम नमूद करतो की प्रा. दि. य. देशपांडे यांची त्यांनी केलेल्या नीतिविचारांच्या मांडणीचा प्रस्तुत लेखकाने आपल्या मूळ लेखात जो संक्षेप दिला आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.
विषय «इतर»
भोळे यांचे परीक्षण निराशाजनक
सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास या ग्रंथावरील श्री. भा. ल. भोळे यांचे परीक्षण उत्सुकतेने वाचायला घेतले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका काहीशा दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारा, स्वतंत्र दृष्टीने लिहिलेला हा संशोधनग्रंथ, आणि तोही एका ताज्या दमाच्या व नवोदित अभ्यासकाने लिहिलेला; त्यामुळे ही उत्सुकता वाटत होती. शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे प्रा. भोळे यांनी साधार खंडन केलेले असेल, ग्रंथातील निष्कर्षांचीही साक्षेपी समीक्षा त्यांनी मांडलेली असेल, असे वाटले होते. पण परीक्षण वाचून साफ निराशा झाली, आणि आश्चर्यही वाटले.
मोर्यांलच्या या संशोधनग्रंथाचा गाभा जाणून घेऊन तो वाचकांपुढे ठेवण्याऐवजी, लेखकाच्या आक्रमक भाषाशैलीचीच चर्चा यात अधिक आहे.
चर्चा – निसर्ग आणि मानव
प्रा. दि. य. देशपांडे यांच्या निसर्ग आणि मानव (आजचा सुधारक नोव्हें.डिसें. ९३) या लेखात त्यांना म्हणावयाचे आहे ते असे :
-१.-
चेतन-अचेतन असा फरक करण्याची कसोटी कोणती?माणसाला त्याच्या ठायीच्या चेतनेचा जसा स्वानुभव येतो, तिचे ज्या स्वरूपाचे आत्मभान त्याला असते तसा स्वानुभव येणे व आत्मभान भाषेद्वारा प्रकट करता येणे ही कसोटी मानली तर, प्रा. देशपांडे यांचे म्हणणे मान्य करण्यात कोणतीच अडचण नाही. पण ही कसोटी मानवकेंद्री (anthropocentric) आहे. भौतिक निर्जीव सृष्टीत चेतना कार्य करीत असते की नाही हे केवळ या स्वयंकेद्री कसोटीच्या आधारे ठरविणे सयुक्तिक आहे का?
स्त्री असुरक्षित आहे
हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या स्त्रियांवर देवादिकही पापी दृष्टी ठेवीत, असे आपली पुराणे सांगतात. कामसूत्रात कुलीन स्त्रीला वश करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. बहुपत्नीकत्व होतेच, पण त्या स्त्रियांचे भरणपोषणही न करता चैन करण्याचा मार्ग बंगालच्या ‘कुलीन भूदेवांनी शोधून काढला.
सुधारणा झाल्या?
प्रश्न : स्त्रिया… डॉक्टर-इंजीनिअर झाल्या आहेत, विमानेसुद्धा चालवण्याचे प्रयोग झाले आहेत, तरी तुम्हाला स्त्रीजीवनात सुधारणा झाली असं वाटत नाही. सुधारणा म्हणजे नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत?
गीता साने : हे विशिष्ट वर्गात-मध्यमवर्गात झालेले बदल आहेत. … मध्यमवर्गात शिक्षण वाढलं, विचार वाढला, जीवनसंघर्षही वाढला, यातून विशिष्ट वर्तुळात काही सुधारणा झाल्या. पण मध्यमवर्गाचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे. बाकीचा सगळा खालचा वर्ग आहे. या वर्गात परिवर्तन झाल्याशिवाय पूर्ण चित्र बदलणार नाही. या बायकांना कोणतंही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. कायदे तुम्ही वाटेल ते करा, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीत….
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग-१)
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे?
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची साल काढणे, म्हणतात, ते करणारा व्यवसाय. केस ही मुळात किती बारीक वस्तु, तिची साल काढल्यावर शिल्लक काय उरणार? म्हणजे जिथे कसलाही भेद नाही तिथे भेद उकरून काढणारा हा विषय आहे.’
विवाहाविषयी आणखी थोडे
श्री संपादक, आजचा सुधारक, यांस,
आपल्या ऑक्टोबर १९९२ च्या अंकामध्ये विवाह आणि नीती ह्या विषयावर आपण आपली स्वतःची भूमिका मांडली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात स्त्री उवाच ह्या वार्षिकाचा परिचय अनुराधा मोहनी ह्यांनी करून दिला आहे, त्यात विवाह हा विषय आहे, आणि त्याच अंकात श्री. गं.र. जोशी ह्यांचे ‘समतावादी कुटुंब!’ ह्या शीर्षकाचे पत्र त्याच विषयावर आपण प्रकाशित केले आहे. त्यांपैकी श्री गं.र. जोशी ह्यांच्या पत्राविषयी माझे मत.
लग्न ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे अगणित पैलू आहेत. ती आपल्या सध्याच्या कुटुंबसंस्थेची आधारशिला असल्यामुळे तो संपूर्ण मानवजातीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
संभ्रमात टाकणारे इतिहास-संशोधन
‘श्रीरामाची अयोध्या उत्तरप्रदेशात नसून अफगाणिस्थानात असावी’ असा दावा बंगलोर येथील इन्डियन इन्स्टिस्टूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. राजेश कोछर यांनी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इन्डियाच्या दि. २० ऑक्टोबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. दुसरी अशाच प्रकारची बातमी नागपूरच्या हितवाद च्या दि. २३ नोव्हेंबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, डॉ. आर.के. पाल नावाच्या हौशी प्राच्यविद्या संशोधकाने गौतम बुद्ध हा मेसोपोटेमियात होऊन गेला, असा शोध लावला. दोन्ही शोध निश्चितच पारंपरिक मताला धक्के देणारे आहेत. जुनी कागदपत्रे, शिलालेख वा पुरातत्त्वीय अवशेष यांच्या नवीन उपलब्धीमुळे नवीन प्रमेये मांडली जातात आणि इतिहासावर नवा प्रकाश पडतो.
आगरकर-चरित्राच्या निमित्ताने
राष्ट्रीय चरित्रमालेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे एक संक्षिप्त चरित्र प्रख्यात विचारवंत, लेखक आणि समाजविज्ञान-कोशकार श्री स. मा. गर्गे यांनी लिहिले आहे. आजचा सुधारक गेली दोन अडीच वर्षे आगरकरांनी पुरस्कारलेल्या विवेकवादाचा प्रसार आपल्या मगदुराप्रमाणे करीत आहे. तेव्हा त्याने या अल्पचरित्राची ओळख आपल्या वाचकांना करून द्यावी म्हणून श्री गर्गे यांनी ते आमच्याकडे धाडले. त्या चरित्राच्या निमित्ताने आगरकरांना आदरांजली वाहण्याची ही संधी आम्ही घेत आहोत.
टिळक आणि आगरकर या दोघांचाही जन्म १८५६ चा. धाकट्या शास्त्रीबुवांनी निबंधमालेतून आधुनिक शिक्षितांस केलेल्या विज्ञापनेने भारावून गेलेले हे दोघेही तरुण या हतभाग्य भारतभूच्या चरणावर आपली जीवनकुसुमे वाहण्यासाठी शास्त्रीबुवांच्या उद्योगात सामील झाले.
पुस्तक परिचय
गोपाळ गणेश आगरकर, ले.- स.मा. गर्गे, प्रकाशक – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-5 ग्रीन पार्क नवी दिल्ली ११० ०१६, किमत रु. २३.००, पृष्ठंख्या १५० + १०
आपल्या देशात जे अनेक थोर लोक होऊन गेले त्यांचा परिचय करून देण्यासाठी पुस्तके प्रकाशित करणे ही आपली जबाबदारी आहे असे चांगले प्रकाशक समजतात. त्यासाठी ते अशी पुस्तके अभ्यासू लेखकांकडून लिहवून घेतात, आणि सुबक अशी पुस्तके वाचकांच्या हाती देतात. गोपाळ गणेश आगरकर हे छोटेखानी पुस्तक अशाच पुस्तकांपैकी एक आहे. चरित्रनायकाच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी, त्याच्या कार्याचा वा व्यक्तिमत्त्वाचा एखादा उपेक्षित पैलू वाचकांच्या नजरेस आणून देण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ नाही.