विषय «इतर»

ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह-इन-रिलेशनशिप मंडळ : एक विचार

रोज सकाळी फिरायला जाताना मला एक वृद्ध जोडपे हातात हात घालून कधी पाठमोरे तर कधी समोरून येताना दिसते. मनातल्या मनात मी ‘जोडी अशीच अभंग राहो’ ही सदिच्छा व्यक्त करते. आयुष्याची अशी रम्य पहाट किंवा संध्याकाळ सगळ्यांच्याच वाट्याला येईल असे नाही. विवाह करून सहचराचा हातात घेतलेला हात कधीतरी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर सुटू शकतो अन् मग सुरू होते उर्वरित जीवनाची त्याची/तिची एकाकी वाटचाल! हे एकाकीपण सहन करणे, निभावणे खूप कठीण असते. पण त्याला पर्यायही नाही असे वाटत असतानाच वर्तमानपत्रातून ‘ज्येष्ठ व्यक्तींसाठी Live-in-relationship मंडळ’ स्थापन होणार अशी बातमी वाचनात आली.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (३)

आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का?

निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदीप्यमान, विस्मयकारक ठिणग्यांमधूनच – ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच – आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा.
आपले अंतर्मन मात्र या विश्वात आपण एकटे नाही असे सांगत असते. कुठल्याही इतर साधनांच्या मदतीशिवाय आपण सुमारे 2000 तारे बघू शकतो. आपल्या दीर्घिकेत सुमारे 5 कोटी (50 दशलक्ष) तारे असण्याचा अंदाज आहे.

पुढे वाचा

सिंगापूर आणि टी-ट्वेंटी वृत्ती

” (इंडियन एक्स्प्रेसचे संपादक शेखर गुप्ता काही डावे विचारवंत म्हणून प्रसिद्ध (किंवा बदनाम!) नाहीत. परंतु त्यांनाही उच्चवर्गीयांचा भारतापुढचे प्रश्न सोडवण्याबाबतचा लोकशाही-विरोधी व्यवस्थापकीय दृष्टिकोन आवडत नाही. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाईटवर 25 जून 2011 ला अवर सिंगापूर फँटसी नावाचा एक लेख लिहिला. त्याचा हा सटीप वृत्तान्त.]
गुप्तांना गुंतवणूक संस्थांच्या पाचेकशे प्रतिनिधींपुढे आजचे भारतीय राजकारण यावर बोलायला पाचारण केले गेले. पुढ्यात आयआयटी/आयआयएम्समध्ये शिकून आलेले पाचेकशे जागतिकीकृत वित्तव्यवहारतज्ज्ञ होते. (‘शंभर डॉलर्सचे हर्मेस टाय ल्यालेले, डॉलर्समध्ये सात आकडी पगार घेणारे, छानछोकी गाड्या वापरणारे”)
गुप्तांनी IIT/IIM ह्या संस्थांमध्ये सुरुवातीपासून जात्याधारित आरक्षण असल्याचा उल्लेख केला.

पुढे वाचा

कारागृहातील महिलांची स्थिती

दि.3 एप्रिलच्या हिंदू ह्या दैनिकामध्ये दिव्या त्रिवेदी ह्यांनी कारागृहांमध्ये होणारी महिला कैद्यांची छळणूक ह्या विषयावर एक छोटासा लेख लिहिला आहे. त्याचे शीर्षक आहे – सर्व कारागृहे सोनी सोरींनी भरली आहेत.
ह्या लेखात महिला कैद्यांना दिलेल्या बेकायदेशीर, अमानुष वागणुकीचे किस्से कचन केले आहेत. त्यातील काही आसु च्या वाचकांसाठी देत आहे.
1. तिहार कारागृहाच्या वार्ड क्र.8 च्या वॉर्डनशी थोडी वादावादी झाल्यामुळे जोहरा बरताली हिला ओटीपोटात जबरदस्त गुद्दे मारण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून तिला एक महिनाभर रक्तस्राव होत होता. शेवटी त्यातच तिचा अंत झाला.

पुढे वाचा

ही स्त्री कोण? (भाग २)

Women पासून Womanist आणि womanish रूपे आली. Womanish हा शब्द मुख्यतः अमेरिकन काळ्या माताकडून वयात आलेल्या पौगंडवयीन मुलींसाठी वापरला जाणारा बोलीभाषेतील शब्द आहे. पौगंडवयीन मुलींना पूर्ण स्त्रीत्वाकडे नेणारा या अर्थाने पण girlish च्या विरुद्ध अर्थी वापरला गेला.
हा अर्थ घेऊनच feminism ही संज्ञा आणि संकल्पना रुळली, नवा वैचारिक प्रवाह अस्तित्वात आला आणि स्थिरावला. पण feminism ही गोऱ्या स्त्रियांसाठीचा पक्षपात करणारी शब्दरचना असल्याने womanism ही संज्ञा आली. Womanism हा ‘त्या रंगाची स्त्री’ (women of color) आणि तिचे विदारक अनुभवविश्व यांचे वर्णन करण्यासाठी ही संज्ञा ॲलिस वॉकर41 या लेखिकेने तिच्या In Search of Our Mothers’ Gardens : Womanist Prose (1983) या लेखसंग्रहात प्रथम शब्दबद्ध केली, Womanist चेच प्रगत रूप womanish होय.

पुढे वाचा

पत्रसंवाद

बाबूराव चंदावार, साईनगर, दी. 1, फ्लॅट-13, सिंहगड रोड, पुणे 411030. दूरध्वनी – 020-24250693
आमचे चिरंजीव उत्पल चंदावारकडे आजचा सुधारक येतो. अधूनमधून मी पाहत असतो. मार्च2012 चा अंकही पाहिला आहे. यात नक्षलवादी, लोकशाहीच देशाची अखंडता’ हा श्री देवेन्द्र गावंडे यांच्या पुस्तकातला अंश मुखपृष्ठावर दिलेला आहे विरोधातलीच भूमिका आजचा सुधारकची आहे, असेच मला वाटले. श्री देवेन्द्र गावंडे यांची भूमिका विरोधातलीच आहे, हे मला या आधीपासूनच माहीत आहे. अर्थात नक्सलवादाची राजकीय विचारसरणी क्रांतीची आहे, ती सुधारणावादाची नाही. म्हणून, आपली नक्सलविरोधाची भूमिका याला साजेशीच आहे, असे म्हणायला हरकत नसावी.

पुढे वाचा

हिंदुधर्म आणि हिंदुत्व

(सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता) हे विसाव्या शतकाने जगाला दिलेले मूल्य. ‘आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत’ असे संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केले आहे. इहवाद हा सेक्युलॅरिझमचा एक अर्थ असला, तरी, सामाजिक जीवनात धर्म न आणणे, सामाजिक व वैयक्तिक जीवन त्या अर्थाने परस्परमुक्त ठेवणे हा त्याचा खरा अर्थ होता. धर्मनिरपेक्षता ही आतापर्यंत पुरोगामित्व व विवेकवाद ह्यांची खूण समजली जात असे. धर्मचिकित्सेपासूनच सर्व चिकित्सांची सुरुवात होते असे मानण्यातून ह्या संकल्पनेची सुरुवात झाली. आता मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन, त्या शब्दाचा आजचा अर्थ, व्यक्तिगत जीवनातही धर्माचे पालन न करणे असा झाला आहे, कारण, पुरोगाम्यांच्या मते धर्मापासून मुक्ती ही सामाजिक जीवनाची पूर्वअट मानली जाते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

दत्तप्रसाद दाभोळकर, ‘या’ सदर बझार, सातारा. स्थिरध्वनी (02162)239195), भ्रमणध्वनी : 9822503656 id : dabholkard@dataone.in .
सूर्यापोटी शनैश्वर…? पण कोण…?
आजीव वर्गणीदारांची व्यथा मांडणाऱ्या माझ्या पत्राची खिल्ली उडवीत मला तर्कट तिरकस भाषेत दिलेले आपले उत्तर (आ.सु.494, फेब्रुवारी 2012) वाचले. आम्ही संपादक आहोत. मासीक आमचे आहे. तुमचे पैसे बुडवून वर आम्ही, तुमचीच आमच्या मासीकात खिल्ली उडव शकतो हा तमचा अहंकार मी समजू शकतो. पण रस्त्यावरचे गंड ज्याप्रमाणे आई, वडील, जात यांचा उद्धार करीत एखाद्यावर हल्ला करतात. त्याप्रमाणे माझे कुटुंब, परिवार यांचा उद्धार आपण करावयास नको होता.

पुढे वाचा

नक्षलवाद, लोकशाही व देशाची अखंडता

नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचाराविरुद्ध लोकप्रतिनिधी बोलत नाहीत कारण त्यांना जिवाची भीती असते व निवडणुका जिंकायच्या असतात. विकासकामांना विरोध हे नक्षलवाद्यांचे अजूनही प्रभावी हत्यार असले, तरी यामागील गणिते परिस्थिती बघून ठरवली जातात. जनतेने विकासकामात सहभागी होऊ नये असे बजावणाऱ्या नक्षलवाद्यांना कंत्राटदारांनी केलेली कामे चालतात, कारण त्यांतून खंडणी मिळते. त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागाचा पायाभूत विकास झाला तर जनता पाठीशी राहणार नाही, अशी भीती या चळवळीला सतत वाटत आली आहे. यामुळे अशा प्रकरणांत खंडणी उकळताना अतिशय सावध पावले उचलली जातात. नक्षलग्रस्त भागाचा विकास झाला तर आदिवासी प्रगत होतील व कोणताही प्रगत माणूस या चळवळीकडून होणाऱ्या नरसंहाराबाबत शांत बसणार नाही याची जाणीव नक्षलवाद्यांना आहे; म्हणूनच त्याना विकास नको आहे.

पुढे वाचा

पैशाचे मला दिसणारे स्वरूप (१)

कोणत्याही वस्तूला. मूल्य येते. ते तिला असलेल्या मागणीमुळे. ज्या वस्तूला मागणी नाही, तिला किंमत नाही. ही मागणी एकतर गरजेपोटी किंवा हावेपोटी असते. गरज लवकर पुरी होते आणि हाव कधीच संपत नाही. ज्या वस्तूची गरज लवकर संपेल, तिला किंमत असली तरी ती अत्यल्प असते. उदाहरणार्थ, तर अन्न! …..
सोन्याला व रजांना जी किंमत असते ती त्यांच्याविषयी माणसाला वाटणाऱ्या हावेमुळे प्राप्त झाली आहे.
सध्या पैसा म्हणून जी वस्तू वापरली जाते. ती म्हणजे कागद! कागदाची उपलब्धता विपुल आहे. त्याला किंमत कमी असते; पण त्या क्यगदावर सरकारकडून विशिष्ट पद्धतीने आकदा कापला गेला की त्या कागदाविषयी प्रत्येकाच्या मनाव व उत्पन्न होते आणि त्या हावेमुळे केवळ त्या कागदाचा उपयोग चलन म्हणून होऊ शकतो.

पुढे वाचा