विषय «इतर»

वेताळकथाः २ पळा, पळा, कोण पुढे पळे तो!

राजा पुन्हा वेताळाला खांद्यावर घेऊन वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, “राजा, विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम निवडताना स्वत;चा कल, स्वतःची क्षमता, यांच्याकडे लक्ष न देता ‘चलती कशाची आहे, हेच फक्त पाहिले तर त्यातून उद्भवणाच्या प्रश्नांचे एक टोकाचे उदाहरण मी तुला दाखवले. धन्य तुझी, की तू त्या कथेला दलित-ललित न समजता किंवा आयायट्यांवर केलेली टीका न मानता छान ‘सिनिकल दुर्लक्ष केलेस! पण आज मी तुला एक वेगळी कहाणी ऐकवणार आहे. मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. पण तो अनेक उत्तरांमधून एक निवडण्याचा, म्हणजे ‘मल्टिपल चॉईस प्रश्न आहे, ऐक.”

पुढे वाचा

गुणवत्ता व आर्थिक मदत/दंड

शिक्षणासाठी आर्थिक मदत करताना शासनाने (किंवा शासनाच्या आदेशाने इतरसंस्थांनी) विद्याथ्र्यांची आर्थिक स्थिती हा निकष मानावा की त्याची गुणवत्ता हा निकष मानावा याची चर्चा या लेखात केली आहे.

सध्या वैद्यकीय किवा अन्य व्यावसायिक शिक्षणासाठी दोन प्रकारच्या शिक्षणसंस्थांत प्रवेश दिला जातो. पैकी अनुदानित शिक्षणसंस्थांना शासनाकडून अनुदान मिळाल्याने तेथील विद्याथ्र्यांना (यापुढील आकडे उदाहरणादाखल वैद्यकीय शिक्षणाचे आहेत) प्रतिवर्षी ४ ते ६ हजार रुपये फीमध्ये शिक्षण मिळते. शासनाकडून मिळणारे अनुदान प्रतिवर्षी अंदाजे रु. ५४,०००/- प्रत्येक विद्याथ्र्यामागे असते. गुणवत्ता व राखीव जागा यानुसार या सर्व जागा भरल्या जातात.

पुढे वाचा

‘स्त्रीमुक्ती चे सुस्पष्ट चित्र हवे!

‘चतुरंग पुरवणीतील मीना देवल यांचा ‘स्त्रीमुक्ती : मिथक आणि वास्तव हा लेख वाचनात आला. ‘स्त्रीमुक्तीसंबंधी कार्य करणार्या’ अनेक संघटना सध्या सक्रिय आहेत. या संकल्पनेवरील लेख, भाषणे, परिसंवाद आदींतून उलटसुलट विचार मांडले जात आहेत. देवल यांच्या लेखात कार्यकर्त्यांना स्त्रीमुक्तीची चळवळ समाजापर्यंत पोहोचवता आली नाही, तसेच स्त्रीवादी भूमिका समाज तसेच स्त्रिया स्वीकारावयास तयार नाहीत, ही खंत दिसून येते. लिंगभेदविरहित समाजव्यवस्था अस्तित्वात आली तरच हे दुष्टचक्र संपेल, असे आशावादी चित्र त्यांनी रेखाटले आहे.
तेव्हा त्याच दृष्टीने हे विचार मांडत आहे. स्त्रीला एक उपभोगाची वस्तू समजले जाऊ नये किंवा तसा तिचा वापर होऊ नये, कोणत्याही क्षेत्रात तिच्या गुणवत्तेवर तिला प्रवेश असावा, स्त्री म्हणून मज्जाव, आडकाठी असू नये, तिला अमानवी वागणूक मिळू नये, समान हक्क, मतस्वातंत्र्य असावे याबद्दल दुमत असायचे काहीच कारण नाही.

पुढे वाचा

एक प्रतिक्रिया- खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (७)

‘सायंटिफिक अमेरिकन’ फेब्रुवारी ९५ च्या अंकामध्ये पार्थ दासगुप्ता ह्यांच्या ‘लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण’ ह्या शोधनिबंधाविषयी माहिती आली आहे. उद्याचे जग जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे सुखी होण्यासाठी लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण ह्या घटकांचा विकासाशी संबंध आहे अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. ह्या संदर्भात लेखकाने ह्यामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते, स्त्रिया जेव्हा संपूर्ण आर्थिक स्वावलंबन मिळवितात तेव्हाच कौटुंबिक सामाजिक निर्णयप्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. आपल्याला आकडो न आवडो, समाजामध्ये ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच मानाने व आदराने वागविले जाते. मारून मुटकून कुणी कुणाला मान देऊ शकत नाही किंवाआदराने बघणार नाहीं.

पुढे वाचा

बंडखोर पंडिता (भाग ४)

आगरकरांनीही अखेर पाठिंबा काढून घेतला ही गोष्ट रमाबाईंना लागली असणार. ज्या समाजात मोठमोठ्या धुरंधर नेत्यांबरोबर त्यांची उठबस होती, ज्योतिबा फुल्यांसारख्या बहुजनसमाजातल्या सुधारक कार्यकत्र्यापासून तो केरूनाना छत्र्यांसारख्या ज्योतिर्विद पंडितापर्यंत सर्वांच्या कौतुकादराचा विषय त्या झालेल्या होत्या, त्या समाजापासून त्या तुटत जाऊन एखाद्या मठस्थ जोगिणीचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. तेही त्यांनी शांतपणे पत्करले.
यानंतर १८९६ सालची गोष्ट. आता शारदासदनात ख्रिस्ती झालेल्या १५ मुली उरल्या होत्या. त्यांच्या पालक अर्थातच रमाबाई होत्या. या १५ धर्मकन्यकांना घेऊन एका प्रार्थनाशिबिरासाठी त्या लोणावळ्याला गेलेल्या होत्या. तिथे त्यांनी अत्यंत मनोभावे देवापाशी प्रार्थना चालविली की, ‘देवा!

पुढे वाचा

चर्चा : अमेरिकेतील लोकांची लैंगिकता

“अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” (आ. सु. १९९५, ६: २,४९-५४) या माझ्या लेखावर (१) श्रीमती ललिता गंडभीर व (२) प्रा. फक्रुद्दीन बेनूर यांनी अभिप्रायात्मक लेख लिहिले आहेत. (आ. सु., ऑगस्ट ९५). सुधारकातील लेख वाचले जातात व त्यांच्यावर विचार होतो हे पाहून प्रसन्नता वाटते. या उभयतांच्या मतप्रदर्शनाच्या संदर्भात मला थोडे विवेचन करण्याची इच्छा आहे.
(१)लेख अमेरिकेतील लोकांच्या लैंगिकतेविषयी झालेल्या सर्वेक्षणाचा परिचय साक्षेपी मराठी वाचकांना करून देण्यासाठी होता. या सर्वेक्षणाचे निकाल अनपेक्षित असल्यामुळे, सर्वेक्षणाच्या नमुन्यात आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन लोकांचा योग्य प्रमाणात सहभाग नसावा अशी शंका व्यक्त केली होती.

पुढे वाचा

शारदेचा पुनर्जन्म

माझे परम मित्र प्रा. कुळकर्णी यांचा पुनर्जन्मासंबंधी शोध घेणारा एक प्रश्नांकित लेख वाचला. (आजचा सुधारक, ऑगस्ट १९९५) प्रा. व. वि. अकोलकरांनी कधी काळी पुनर्जन्मासंबंधी त्यांना अनुकूल असे जे चूक निष्कर्ष काढलेत त्या लेखाचे वाचन करून त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्यांच्या अश्रद्ध अशा भूमिकेला या लेखाने हादरा बसला. एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा दुसऱ्यां देहाचा आश्रय घेऊ शकतो हे प्रा. कुळकर्णीना मान्य झाले असावे. अन्यथा त्यांनी प्रा. अकोलकरांशी प्रतिवाद केला असता.
शारदा नावाच्या बंगाली युवतीचा आत्मा बंगालमधून शेकडो मैल अंतर कापून शंभर वर्षानंतर, बंगाल नागपूर दरम्यान असणारी लक्षावधी शरीरे नाकारून फक्त उत्तरा नावाच्या नागपुरातील एका युवतीच्या देहाचा आश्रय घेऊनच अवतीर्ण झालेला असतो अशी ही नाट्यमय घटना, प्रा.

पुढे वाचा

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)

उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शक्ती वाढावी ह्यासाठी समाजामध्ये ज्यूडोकराटेचे वर्ग कसे सुरू केले गेले आहेत आणि तिला नोकर्यांवमध्ये कसे सामावून घेतले जात आहे, अनुकंपेच्या आधारावर विधवांना आज नोकर्याक कश्या मिळत आहेत ते मला सविस्तरपणे समजावून दिले जाईल.

पुढे वाचा

चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?

सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे.
मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना क्रान्तदर्शनाची दिव्य अंतर्दृष्टी (clairvoyance) त्यांच्या पौर्वात्य गुरूंकडून प्राप्त झाली होती. ह्या दिव्य अंतर्दृष्टीमुळे सूक्ष्मात सूक्ष्म अणूदेखील मोठ्या आकारात ते आपल्या अंतर्मनात पाहू शकत असत. पातंजल योगसूत्रांत ‘अणिमा’ नामक ह्या सिद्धीची प्रक्रिया सांगितली आहे.

पुढे वाचा

अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही

टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली.

पुढे वाचा