विषय «इतर»

धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय

‘सेक्युलरिझम’ या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द कोणता?प्रा. अ. भि. शहा यांनी ‘इहवाद’ असा शब्द पर्यायी म्हणून वापरला. इहवादी असणे म्हणजे या जीवनातील बाबतीत विचार आणि आचार ठरवताना कुठल्याही पारलौकिकाचा विचार न करणे, माणसाच्या आचारविचारांना फक्त माणसा-माणसांतील व्यवहारांबाबतच्या नीतिनियमांचा संदर्भ असणे, हे नीतिनियम माणसाचे कल्याण कशाने होईल याचा विचार करूनच ठरवलेले असणे. अशा नीतिनियमांना अर्थातच धर्म, ईश्वर या संकल्पनांचा स्पर्श होता कामा नये. माणसाने दुसऱ्यानला लुबाडू नये, कुणाच्या अडचणीचा फायदा घेऊ नये हा नियम जर आपण मान्य केला तर त्याने असे का करू नये या प्रश्नाचे उत्तर इहवादी पद्धतीने द्यायचे तर तसे करणे अन्यायाचे आहे म्हणून, एवढेच होईल.

पुढे वाचा

स्वच्छतेसाठी घाणेरडा विषय

रोग्याचे कल्याण चिंतणार्याा खर्यार बैद्याने जसे पाहिजे तसले घाण काम करण्यास तयार असले पाहिजे तसे समाजहितचिंतक सुधारकाने पाहिजे त्या प्रकारचा विषय हाती घेण्यास सिद्ध असले पाहिजे. अमुक वस्तूचे किंवा अमुक अवयवाचे चारचौघात नाव घेणे किंवा त्याला स्पर्श करणे हा असभ्यतेचा किंवा अमंगलपणाचा प्रकार होय असे पाहिजे तर सामान्य लोकांनी मानावे. भिषग्वर्यांना तो निर्बध लागू करता येत नाही;आणि तसे न करणे जर प्रशस्त असेल तर सामाजिक सुधारकांना तरी तुम्ही अमुक प्रकारच्या विषयावर लिहिणे बरोबर नाही असे कसे म्हणता येईल? ज्या गोष्टीपासून लोकांना तोटा होत असेल ती त्यांना कितीही नाजूक किंवा अस्पृश्य वाटत असली तरी सुधारकाला तिचे उघडपणे दोषाविष्करण करणे भाग आहे.

पुढे वाचा

अध्यात्म आणि तत्त्वज्ञान

लेखाचे शीर्षक पाहिल्याबरोबर अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान?’ ते उद्गारतील. म्हणजे ती दोन आहेत की काय?आमची तर अशी माहिती आहे की त्या दोन गोष्टी नाहीतच; एकाच गोष्टीची दोन नावे आहेत. आणि अशी समजूत आपल्या समाजात प्रसृत झालेली आहे हे मान्य केले पाहिजे. एखादा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे असे ऐकल्याबरोबर त्यात अध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचा बंध आणि मोक्ष यांविषयी विवेचन असणार हे गृहीत धरले जाते. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तत्त्वज्ञानाची पुस्तके हवीत अशी मागणी केल्याबरोबर विक्रेता आपल्यापुढे अध्यात्माची पुस्तके टाकील हे खरे आहे.

पुढे वाचा

‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ -काही विचार

प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी आजचा सुधारक, मार्च १९९६ च्या अंकात ‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ ह्या लेखातून प्रस्तुत विषयाची चर्चा पुन्हा उपस्थित केलेली आहे. पुन्हा म्हणण्याचे कारण असे की ह्या विषयाची चर्चा ह्यापूर्वीही केली गेलेली आहे. ह्या विषयाशी सततसंपर्क ठेवणाच्या व्यक्तींना डॉ. प्रदीप गोखले ह्यांच्या परामर्श, नोव्हें. १९८८ मधील ‘तत्त्वज्ञान-एक स्वदेशी विलापिका’ ह्या लेखाची सहज आठवण होईल. ह्या लेखात डॉ. गोखल्यांनी व्यक्त केलेली व्यथा वेगळ्याच प्रकारची आहे. आपल्या विद्यापीठांमधून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान शिकविण्यावर भर दिला जातो. ह्या तत्त्वज्ञानाचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतो.

पुढे वाचा

श्री मधुकर देशपांडे यांच्या पत्राला (मार्च ९६) उत्तर

माझा बडगा फक्त भारतीय व आशियातील पुरुषांवर पडतो व पाश्चात्त्य पुरुष अतिशय उदारमतवादी असतात अशी कुणाची समजूत झाली तर त्यांची मी माफी मागते. स्त्रियांचे स्थान सर्व जगात दुय्यमच आहे. दुय्यमतेच्या पातळीत कमीअधिकपणा आहे एवढेच.
माझ्या मते अमेरिकेत अविवाहित स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे. विवाहपूर्व संबंधांमुळे स्त्रियांची लग्ने अडत नाहीत. बलात्कारित स्त्रियांवर अमेरिकेत कोर्टात अन्यायच होतो.
डोमेस्टिक व्हायोलन्स’मुळे, नवर्याकने, बॉय फ्रेंडने वा घटस्फोटित नवयाने केलेल्या मारहाणीमुळे बॉस्टनच्या परिसरात दर आठवड्याला एक स्त्री मृत्युमुखी पडते.
ज्या समाजात स्त्रिया अधिक प्रमाणात मुक्त आहेत तिथे पुरुष वेश्या असतात.

पुढे वाचा

हिंदुत्वः ह. चं. घोंगे यांना उत्तर

एप्रिल १९९६ च्या आजचा सुधारक च्या अंकांत “हिंदुत्व : प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे’ हा श्री. घोंगे यांचा लेख आला आहे. त्याला हे उत्तर आहे.
प्रारंभी ‘‘हिन्दुत्व, अन्वेषण (उत्तरार्ध)” डिसेंबर १९९५ या त्यांच्या लेखातील अवतरणे असून त्या खाली मी फेब्रुवारी १९९६ मधील आजचा सुधारकमधील त्यांना विचारलेले प्रश्न आहेत. त्या खाली एप्रिल १९९६ च्या मासिकांतील श्री. घोंगे यांनी मला विचारलेले प्रश्न आहेत व त्यांना मी दिलेली उत्तरे आहेत.
आरंभीच फेब्रुवारी १९९६ मधील लेखात मी स्पष्टपणे लिहिले होते की, आक्षेप त्यांच्या प्रतिपाद्य विषयाबाबत नसून त्यांत जे ऐतिहासिक उल्लेख आले आहेत त्याबद्दल आहेत.

पुढे वाचा

अधर्म कशाला म्हणावे?

अनेकदा व्यक्त केली जाणारी ‘सर्वांनी सुखी असावे, कोणी दुःखी असू नये’ ही अपेक्षा उदात्तच आहे. परंतु जगात सहसा असे असत नाही. काही जण सुखी झाले, तर काही जणांच्या वाट्याला दुःख येतेच. ज्याच्या वाट्याला दुःख असेल त्याला धीर देणे, दिलासा देणे व त्याचे दुःख हलके किंवा दूर करण्याचा प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हाती असते. ते केले नाही, तरी त्याच्या दुःखाने दुःखी होऊन त्याच्याशी समरस होणे शक्य असते. त्याच्या दुःखामध्ये आनंद किंवा त्याउलट त्याच्या सुखामध्ये दुःख मानणे ही मात्र विकृती आणि अशी विकृती तो मनुष्य दुसऱ्या, विशिष्ट धर्माचा असल्यामुळे आपल्या मनात निर्माण होत असेल तर अशा विकृतीला जन्म देणाच्या घटकाला आपणधर्म मानू शकत नाही.

पुढे वाचा

काम आणि नीती

कामव्यवहार आणि नीती यांचा परस्परसंबंध काय आहे?
सामान्यपणे असे मानले जाते की नीतीचे क्षेत्र मुख्यत: कामव्यवहाराचे आहे आणि या क्षेत्रात नीती म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कामव्यवहार विवाहांतर्गत होत राहणे म्हणजे नीती, आणि विवाहबाह्य कामव्यवहार म्हणजे अनीती अशी स्वच्छ समीकरणे याबाबतीत आहेत. एखादा पुरुष, त्यातही एखादी स्त्री, अनीतिमान आहे असे कोणी म्हणाले तर त्यांचे विवाहबाह्य लैंगिक संबंध आहेत असे अनुमान काढले जाते, आणि ते बरोबर असते.
परंतु वस्तुत: नीतीचे क्षेत्र कामक्षेत्रापेक्षा कितीतरी व्यापक आहे. चोरी, दरवडे, खून, मारामाच्या, फसविणे, नफेखोरी, काळाबाजार, गरिबांना, अशक्तांना, निराधारांना लुबाडणे, त्यांच्या मेहनतीवर पैसे मिळविणे, वेठबिगारी हे सर्व अनीतीचे भयानक प्रकार आहेत.

पुढे वाचा

“हट्ट”

आनंद दत्तात्रय मुठे हट्टी होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं आईपाशी हट्ट धरला, ‘खर्यारखुर्याह’ क्रिकेट बॅटसाठी. आई म्हणाली, “चारशेची आहे ती! चल, हट्ट न करता शहाण्या मुलासारखी दहा रुपयेवाली फूटपाथवरची बॅट घे.’ आनंद ऐकेना, म्हणाला, “मी श्वास कोंडून धरणार, खरीखुरी बँट मिळेपर्यंत’. दम कोंडून तो लालनिळा झाला, पण बॅट मिळाली.
पंधरा वर्षाचा असताना त्यानं व्हिडिओ गेम सिस्टिम’ साठी हट्ट धरला. मोठा भाऊ म्हणाला, चार हजाराचा आहे तो! चल, हट्ट न करता शहाण्यासारखा शंभर रुपयांचा ‘लोगो’ घे.’ आनंद ऐकेना. म्हणाला, “मी अभ्यासच करणार नाही.

पुढे वाचा

यांत्रिक (कृत्रिम) बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता उपयुक्त की भावना या वादात अलीकडे भावनिक गुणवत्तेचे पारडे जड झाल्यासारखे दिसते आहे (आजचा सुधारक ६ : ३९९). केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून असलेली मानवाची बरीच कठीण कामे, आता यंत्राद्वारे पार पाडण्याच्या उद्देशाने अनेक वैज्ञानिक कठोर परिश्रम करीत आहेत. यांत्रिक अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence = AI) नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेच्या स्तरावर नेण्याचे प्रयत्न गेल्या चाळीस वर्षांपासून होत आहेत. अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांतून याविषयी संशोधनअध्यापन होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानियातील मूर स्कूल ऑफ इंजिनियरिंगमधील डॉ. अरविंद जोशी हे १९७० च्या दशकात या विषयाचे प्रमुख होते व मौखिक भाषेचे संगणकाच्या भाषेत तात्काळ रूपांतर करण्याचे प्रयोग ते करीत होते.

पुढे वाचा