लॅप इंटर नॅशनल या संस्थेने केलेल्या एका पाहणीचा आजच्या सुधारकच्या वाचकांसाठी घेतलेला एक आढावा. 57 देशात घेतलेल्या या पाहणीत सुमारे 52000 पुरुष आणि स्त्रियांचा यात समावेश होता. प्रत्यक्ष मुलाखत, टेलिफोन व इंटरनेट या तिन्ही माध्यमांचा वापर करण्यात आला.
ह्या पाहणीत सर्व स्त्री पुरुषांना एकाच प्रश्न विचारण्यात आला: तम्ही धार्मिक स्थळांना भेट देता किंवा देत नाही याला महत्त्व न देता, तुम्ही स्वतःला धार्मिक, अधार्मिक वा नास्तिक संबोधता?
या पाहणीनुसार 59% लोक स्वतःला धार्मिक, 23% लोक स्वतःला अधार्मिक व 13% लोक स्वतःला पूर्णपणे नास्तिक समजतात.
विषय «इतर»
गावगाडा – खाद्यसंस्कृती
पूर्वी खेडेगावातल्या प्रथेप्रमाणे लहान, थोर, श्रीमंत, सर्वांकडे, आपल्या इथे जे पिकते तेच खायचे अशी पद्धत होती. त्यामुळे बहुतेकांच्या घरी सारखाच मेनू असे. दररोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी, साधारण परिस्थिती असलेल्या लोकांकडे कोरडे कालवण, ‘कोरड्यास’ म्हणजे भाजी अथवा दाळ, जी भाकरीवर घालून भाकरी दुमडून ‘पॅक’ करता येईल असे पदार्थ असत. जरा बरी परिस्थिती असलेल्यांकडे पातळ कालवण भाजी अथवा दाळ, कधी कधी भुईमूग अथवा सूर्यफूल अथवा इतर तेलबियांची कोरडी चटणी, सोबत सीझनप्रमाणे कांदा अथवा काकडी, हा मेनू न्याहारीत व दुपारच्या जेवणात असे. घरी जेवायचे असल्यासच पातळ कालवण कांदा वगैरे असे.
एका फसलेल्या अपहरणाची गोष्ट
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक विमान कंपनी होती. तिचे नाव कुठल्याशा पक्ष्यावरून दिले होते; म्हणजे अशी जुन्या लोकांची आठवण होती. आता मात्र तिला सर्वजण केएफए म्हणजे खाली फुकट एअरलाइन्स म्हणून संबोधायचे. ही कंपनी डबघाईला आली होती. वैमानिक संपावर गेले होते आणि कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. तिला ज्यांनी मोठमोठी कर्जे दिली अश्या बँका बुडू लागल्या होत्या. पण त्या कंपनीचे एक वैशिष्ट्य होते, ज्यामुळे तिला कधी प्रवाशांची ददात पडत नसे. ती हायजॅकप्रूफ होती. ही प्रसिद्धी कंपनीला कशी मिळाली, त्याचा हा किस्सा —
काही महिन्यांपूर्वी घडलेली गोष्ट.
पत्रसंवाद
संजीव चांदोरकर, 206, मेहता पार्क, भागोजी कीर मार्ग, लेडी जमशेटजी रोड, माहीम (पश्चिम), मुंबई 400016. —
गेल्या काही अंकांपासून मासिकाच्या वर्गणीवरून जो काही पत्रव्यवहार अंकात छापला जात आहे त्यातून भावना बाजूला काढल्या तर समाज सुधारणेला वाहून घेतलेले आसूसारखे व्यासपीठ (जे 22 वर्षे सातत्याने चालवणे हीच मोठी गोष्ट आहे) आजच्या जमान्यात कसे सुरू ठेवायचे या बद्दल अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. दुसऱ्या शब्दांत यामध्ये गुंतलेले मुद्दे या वादात गुंतलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या पलीकडचे आहेत.
सर्वसाधारणतः पुरोगामी, परिवर्तनवादी लोकांमध्ये अशा उपक्रमांच्या ज्या मॅनेजमेंटच्या बाजू आहेत (दैनंदिन व्यवस्थपान, कॉस्टिंग, दीर्घ पल्ल्याची वित्तीय स्वयंपूर्णता इत्यादी) याकडे बघण्याचा आपोआपवादी दृष्टिकोण प्रचलित आहे.
पत्रसंवाद
गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स्, दर्यापूर, जिल्हा अमरावती -444803.
आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदू विज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचून झाल्यावर अतृप्तीच शिल्लक राहाते; व त्या अतृप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत. पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही..
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे मातीचे मडके तयार होते. त्या मडक्यात पोकळी असते. म्हणजे काहीच नसते. काहीच नसण्याचा अस्तित्वाचा घटक त्या मडक्याच्या उपयोगितेला कारण ठरतो!
माणसाच्या कवटीच्या आत मेंदू असतो.
मर्यादित स्त्रीमुक्ती
कुटुंबनियोजन, बालसंगोपन ह्यांविषयीच्या धारणा, त्याच्याशी निगडित तंत्रविज्ञान व सामाजिक संस्था ह्यांच्यामुळे स्त्रियाही सड्या राहू शकतात. म्हणून आता सत्ता, मत्ता व प्रतिष्ठा ह्यांच्यासाठी पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असण्या-स्वीकारण्याची अपरिहार्यता फारशी उरली नाही. ही तशी चांगलीच घडामोड असली तरी एक प्रकारची दिशाभूल ह्या कारणाने झाली आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती एवढी दृढमूल झालेली आहे की, त्या चौकटीत समानता, स्वतंत्रता व मुक्तता साधण्यामध्ये स्त्रिया समाधान मानीत आहेत, पण ह्याची एक अलिखित शर्त अशी आहे की ज्यांना समान, स्वतंत्र व मुक्त व्हावयाचे असेल त्या स्त्रियांनी जवळपास पुरुषाचाच अवतार धारण केला पाहिजे.
चळवळी का यशस्वी होतात? का फसतात?
[2011 सालाच्या सुरुवातीला आनंद करंदीकरांनी ‘निर्माण’ चळवळीच्या मुलामुलींपुढे एक भाषण दिले. त्या भाषणावरून खालील लेख घडवला आहे. भाषणातील तळमळ आणि जोम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. (जरी त्यामुळे कुठेकुठे प्रमाण भाषेबाबतच्या संकेतांचे उल्लंघन होते!) – संपा. ]
भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा गावागावांत दोन-तीन महत्त्वाचे सामाजिक बदल घडले, त्यांचा माझ्या परीने मी एक धावता आढावा घेणार आहे. हा काही त्यांचा पूर्ण इतिहास नाही. पण मला जे पुढे मांडायचे आहे ते मांडण्यासाठी एक सामाजिक भूमिका निर्माण व्हावी म्हणून मी त्यांचा धावता आढावा घेणार आहे.
मानवी अस्तित्व (४)
गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का?
या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव अस्तित्वात आला नसता. तद्विरुद्ध सशक्त आण्विक बल काही टक्क्यांनी जरी कमी असते तर आपल्या या जगाला आकार देणारे जड मूलद्रव्य अस्तित्वात आले नसते व त्याप्रमाणे मनुष्य प्राणीसुद्धा……
गुरुत्व बल आहे त्यापेक्षा कमी असते तर सूर्याचा गाभा फोडू शकणारी आण्विक , प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सूर्य किरण पोचले नसते.
साहित्यातून विवेकवाद (४) – जॉन बर्जर
निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे सुमारे एक
लक्ष वर्षे पृथ्वीवर जगत आहेत, आणि या आयुष्याचा जवळपास नव्वद टक्के भाग माणसे अन्नसंकलक म्हणून जगत आहेत.
कधीतरी दहाबारा हजार वर्षांपूर्वी माणसे जाणीवपूर्वक अन्न पाळू लागली.
मेंदू आणि जीवनाचा अर्थ (द ब्रेन अँड द मीनिंग ऑफ लाईफ, पॉल थेगार्डच्या पुस्तकाचा परिचय)
अस्तित्वाविषयीच्या गहन प्रश्नांची उत्तरे शोधणे मानवी संस्कृतीच्या इतिहासात नवे नाही. जगभरच्या संस्कृतीत तत्त्वज्ञ आणि धर्मज्ञ यांनी ती शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. साहित्य नाट्य अशा कलाप्रकारांद्वारेदेखील असे प्रयत्न झाले आणि आजही होत आहेत. आधुनिक विज्ञानपरंपरेतून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याला मात्र एवढी दीर्घ परंपरा नाही. आपल्याला ज्ञान असलेले जग कसे अस्तित्वात आले याचा शोध वैज्ञानिक घेत आले आहेत; पण ते का अस्तित्वात आले असावे, किंवा माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, अश्या प्रश्नांना विज्ञानाच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न तुलनेने नवे आहेत. मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या मानसशास्त्रासारख्या विषयाला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून स्थान मिळणे हीदेखील तुलनेने अलीकडची, म्हणजे गेल्या शे-दोनशे वर्षांतली घडामोड आहे.