आपण कोण आहोत? कुठे चाललो आहोत? ह्या विश्वाचा अर्थ काय? ह्या आणि असल्या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देईल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादेवेळी भ्रमनिरास होऊन तुम्ही गूढवादी उत्तरांमागे लागाल. एखादा वैज्ञानिक गूढवादी उत्तर कितपत मान्य करेल याबद्दल मला मला शंका आहे, कारण समजून घेणे हाच खरा प्रश्न आहे, नाही का? पण असो. तुम्ही कसाही विचार केलात तरी आम्ही एका शोधयात्रेत आहोत, हे जग समजून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. लोक मला विचारतात की मी भौतिकीचे अंतिम नियम शोधतो आहे का. असे नाही.
विषय «इतर»
भ्रष्टाचाराचे दृश्य स्वरूप
आपल्या दरिद्री देशामध्ये संपत्ती व वैभवाचे प्रदर्शन केल्याशिवाय सामान्य जनतेवर पकड घेता येत नाही. राजकीय पक्षांची जंगी संमेलने सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमावर उभी राहात नाहीत. मोठे उद्योगपती, कारखानदार, जमीनदार, बिल्डर, व्यापारी यांच्या आर्थिक सहाय्यावर हे प्रदर्शन घडत असते. सर्वच पक्षनेत्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा भव्य सोहळासुद्धा त्यांच्या स्वतःच्या खर्चाने होत नसतो. पण त्यामुळे त्यांना कमीपणा येत नाही आणि एकदा पक्षाच्या निमित्ताने पैसा गोळा करण्याची प्रथा मान्य झाली की, त्यामध्ये दान देणाऱ्याची दानत व उद्देश हा अप्रस्तुत ठरतो. मोठ्या श्रीमंत धार्मिक संस्था किंवा मंदिरांमध्ये दान केलेला सर्व पैसा पवित्रच समजला जातो; त्याचप्रमाणे राष्ट्रासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षाच्या उभारणीसाठी दिलेला पैसाही राष्ट्रधर्मासाठीच आहे, अशी समजूत करून घेतली जाते.
अवैज्ञानिक जनहितविरोध?
फेब्रुवारी २००१ (११.११) च्या अंकात मराठी विज्ञान परिषदेच्या एका स्मरणिकेचा डॉ. र. वि. पंडितांनी परामर्श घेतला आहे. विज्ञान परिषद आणि आजचा सुधारक यांची उद्दिष्टे एकमेकांशी जुळती आहेत, हे डॉ. रविपंचे निरीक्षण योग्यच आहे. ते पुढे नोंदतात की विवेकवाद, स्त्रियांचे समाजातले स्थान, धर्मश्रद्धा वगैरे विषय आ. सु.तल्या अती झालेल्या चर्चेने गुळगुळीत झाले आहेत. त्याऐवजी डॉ. रविपना सुधारणा आणि विकासाचे व्यवस्थापन यावर जास्त खल होऊन हवा आहे.
सुधारणेचा पाया सुशिक्षणात आहे, यावर दुमत नसावे. ‘प्रोब’ हा प्राथमिक शिक्षणावरचा अहवाल दाखवतो की स्त्रियांना महत्त्व न देणाऱ्या आणि जातीपातींच्या विळख्यातल्या ‘बीमारू प्रांतांमध्ये शिक्षणाचे चित्र भीषण आहे.
नीरक्षीरविवेक?
ख्रिस्ती धर्माच्या उदयाच्या आधी यूनानी लोकांची मतेही हिंदूंच्या (सध्याच्या) मतांसारखीच होती. सुशिक्षित यूनानी लोक आज हिंदू करतात, तसाच विचार करत. सामान्य यूनानी लोकही हिंदूंसारखेच मूर्तिपूजक होते. पण यूनानींच्यात दार्शनिकही होते, आणि त्यांनी आपल्याच देशात राहून अंधविश्वासाला थारा तर दिला नाहीच, पण वैज्ञानिक तत्त्वांची पर्यायी मांडणी करून त्यांच्यावर समाधानकारक उत्तरे काढली.
हिंदूंमध्ये वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये परिपूर्णता आणायची क्षमता व इच्छा असलेले लोक नव्हते. यामुळेच हिंदूंमध्ये बहुशः असे दिसते की वैज्ञानिक प्रमेये तार्किक क्रम न लावता अस्ताव्यस्त झालेली आहेत. शेवटी तर अशी प्रमेये जनसमूहाच्या हास्यास्पद धारणांशी गल्लत झालेल्या स्पात दिसतात.
प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया (भाग ४)
प्राथमिक शिक्षणावरच्या प्रोबच्या अहवालावरील हा शेवटचा लेख. आत्तापर्यंतच्या तीन लेखांत त्यांतील पहिल्या पाच प्रकरणांचा जरा विस्ताराने आढावा घेतला. ह्या शेवटच्या लेखात उरलेल्या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे फक्त त्रोटक-पणे नोंदून हिमाचल प्रदेशामध्ये झालेल्या ‘शैक्षणिक क्रांतीची’ माहिती मात्र विस्तृतपणे देत आहे.
आतापर्यंत प्रोब अहवालात वरचेवर येणारे ‘निराशा’, ‘निरुत्साह’, ‘जबाबदारीची उणीव’ ह्या शब्दांऐवजी ‘प्रोत्साहन’, ‘उत्साह’, ‘जबाबदारीची जाणीव’ ह्या शब्दांनी ज्या शैक्षणिक व्यवहाराचे वर्णन करता येईल त्याची कदर करण्याचा हा प्रयत्न आहे, तसेच हिमाचल प्रदेशामध्ये हे का झाले हे सर्वांना समजणे अगत्याचे आहे म्हणून ही माहिती तपशीलवार देत आहे.
खादी (भाग १)
: एक प्रकट चिंतन
आपल्या नोव्हेंबर २०००च्या अंकात खादी एका तत्त्वप्रणालीमधली कडी राहिली नसून तिचे आता फडके झाले आहे असे वाचले. पण त्यात संपादक नवीन काही सांगत नाहीत. खादीचे फडके कधीचेच झाले आहे. त्या गोष्टीला ५० वर्षे उलटून गेली आहेत. रिबेटची कुबडी ज्या दिवशी खादीने स्वीकारली त्या दिवशी किंवा त्या अगोदरच खादी निष्प्राण झाली होती. खादीचे फडके झाले आहे ही गोष्ट सर्व वरिष्ठ खादीवाल्यांना माहीत होती. अण्णासाहेब सहस्रबुद्धे खादीच्या क्षेत्रातले एक श्रेष्ठ कार्यकर्ते. त्यांना फार पूर्वीपासून निराशा आलेली होती आणि ‘खादी अ-सरकारी केल्याशिवाय ती असर-कारी होणार नाही’ असे मत विनोबाजी त्यांच्या लिष्ट शैलीत मांडत असत.
औषधाविषयी
प्रत्येक मनुष्याला स्वतां औषधीशास्त्र समजावें हेच उत्तम. आत्मज्ञाना-पेक्षांहि ह्या शास्त्राच्या ज्ञानाची आवश्यकता जास्त आहे. पण आत्मज्ञान मिळविण्याची मनुष्ये जितकी खटपट करतात तिच्या शतांशहि औषधिज्ञान मिळविण्याची खटपट मनुष्ये करीत नाहीत. फार काय सांगावें, तज्ज्ञ डॉक्टर म्हणविणारेहि जशी खटपट करावी तशी करीत नाहीत. तशी त्यांनी खटपट केली असती तर आलोपथी, होमिओ-पथी, नेचरोपथी, हकीमी अशी अनेक औषधीशास्त्रे न राहातां एकच औषधिशास्त्र राहिले असते. कारण ईश्वरनिर्मित नियम सांगणारें असें औषधिशास्त्र गणितशास्त्रा-प्रमाणे एकच असले पाहिजे. तें एकच खरे शास्त्र कोणतें हे ठरविण्यापुरता तरी अभ्यास सामान्य माणसांनी करून त्या शास्त्राप्रमाणेच चिकित्सा करणाऱ्या तज्ज्ञांचा आश्रय त्यांनी करावा; नाहींतर अनेक प्रयोग आपल्या शरीरावर करवून घेण्याची व शेवटी निराश होण्याची व खरा वैद्य भेटला असतां त्याविषयींहि साशंक असण्याची आपत्ति उत्पन्न होते.
तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल
रसेल यांना जर कुणी विचारले असते – रसेल यांचे नाव केवळ उदा-हरणादाखल आहे की, तत्त्वज्ञानात तुम्ही कुणाचे अनुयायी आहात तर हा प्रश्न त्यांनी रागाने झिडकारला असता. जरा शांत झाल्यावर त्यांनी बहुधा असे उत्तर दिले असते की मी कुणाचा अनुयायी नाही, पण अनेक तत्त्ववेत्त्यांची मते विचारात घेऊन आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून मी माझे स्वतःचे तत्त्वज्ञान घडविले आहे. ते एखाद्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याच्या मतांच्या जवळ येते का हे इतरांनी ठरवायचे आहे. कुणीही लहान मोठ्या तत्त्ववेत्त्यानेही असे उत्तर दिले पाहिजे. तत्त्वज्ञान हा ज्ञानप्रांतच असा आहे की प्रत्येक तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान हे त्याचे तत्त्वज्ञान असते, त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी, वैयक्तिक दृष्टिकोनाशी ते अविच्छेद्यपणे संलग्न राहते.
पुस्तक परिचय दि रिव्हर अँड लाइफ
आतापर्यंत नर्मदा नदीवरील सरदार धरणास विरोध करणारे आणि धरण-विरोधाची चिकित्सक तसेच विवेकी कारणमीमांसा देणारे बरेच साहित्य प्रकाशात आलेले आहे. बाबा आमटे (Cry the Beloved Narmada), क्लॉड अल्वारिस आणि रमेश बिलोरे (Damming the Narmada), अश्विन शाह (Water for Gujarat), जसभाई पटेल (Myths Exploded: Unscientific Ways of Big Dams on Narmada), हिमांशु ठक्कर (Can Sardar Sarovar Project ever be financed?), राहुल राम (Muddy Waters), विजय परांजपे (High Dams on the River Narmada), आणि यांखेरीज इतरांनीही या विषयावर वेळोवेळी पुरेसे सविस्तर लिखाण केले आहे.
मराठी विज्ञान संमेलन स्मरणिका-एक परामर्श
औद्योगीकरणाच्या प्रारंभापासूनच जगात सर्वत्र लोकसंख्या-केन्द्रीकरणात झपाट्याने वाढ झाली. जी ठिकाणे औद्योगिक दृष्टीने सोईची आणि मोक्याची होती तेथील लोकसंख्येची घनता सतत वाढत राहिली व तेथे महानगरे उत्पन्न झाली. भारतातील मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, पुणे, इंदूर, कानपूर, पाटणा, अहमदाबाद यांसारखी महानगरे गेल्या शतकात ४०-५० पटीने मोठी झाली आहेत. ज्या प्रमाणात या शहरांची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात या शहरांजवळ भूमी, धन, जलसंपदा, योजनाकौशल्य व कार्यक्षम स्थानिक शासन याचा कायमचाच अभाव राहला, त्यामुळे ही महानगरे मानवी समूहांचे कोंडवाडे झाल्याची आजची परिस्थिती आहे. उपरोक्त दहा महानगरांमध्येच भारतीयांची सुमारे ७-८ टक्के लोकसंख्या राहते हे लक्षात घेतल्यास या महानगरांची भीषण अवस्था हा नि िचतपणे एक राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरतो.