काही दिवसांपूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रांमधून दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही मुले विद्यार्थी होती आणि शिक्षणाशी संबंधित व्यवहारातून ती आत्महत्येला प्रवृत्त झाली. एका विद्यार्थ्याला कॉपी केल्या-बद्दल शिक्षकांनी बेदम मारहाण केली म्हणून त्याने आत्महत्या केली आणि दुसऱ्याने परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य येऊन आत्महत्या केली. परीक्षा आणि त्यातील यशापयश ह्याचा आणि पर्यायाने शिक्षणाचाही विचार फार व्यापक पातळीवर करण्याची गरज जास्त जास्त निकडीची होत चालली आहे. ह्या करता कुठलेही पाऊल उचलण्या पूर्वीच पाय मागे ओढण्यासाठी अनेक कारणे तत्परतेने पुढे केली जातील, तरीही व्यावहारिक पातळीवर काय करता येईल ज्यामुळे अशा टोकाच्या, निर्वाणीच्या कृती करायला विद्यार्थी प्रवृत्त होणार नाहीत ह्याचा विचार पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण-तज्ज्ञांनी आणि शाळा-चालकांनी करायला हवा.
विषय «इतर»
सोन्याची अंडी?
[सुमारे सोळा लाख माणसांना पूर्णवेळ रोजगार देणारा कुक्कुटपालन उद्योग, शेतीला पूरक म्हणून अर्धवेळ ह्या उद्योगात असणारी माणसे वेगळीच. चांगल्या, सुजाण उद्योजकतेतून जगभरात भारतीय कुक्कुटपालनाचा दबदबा निर्माण झालेला, ह्या उद्योगाचे प्रवक्तेही अभ्यासू आणि आपली बाजू सक्षमतेने मांडणारे—-असा हा उद्योग आज जागतिकीकरणाला सामोरा जात आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्सच्या एका पुरवणीतून ह्या उद्योगाने आपली स्थिती स्पष्ट केली —- त्याचे हे संकलन.]
संभाव्य परिणाम :
जागतिक व्यापार संघटनेशी झालेल्या करारानुसार १ एप्रिल २००१ पासून कुक्कुटपालन-व्यवसायावरील सगळी संख्यात्मक बंधने मोडीत निघतील आणि भारतीय बाजारपेठ अंडी, मांस, इ.
कोटिच्या कोटि अज्ञाने!
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच एक पाहाणी केली. जगभरातल्या लोकांना प्रश्न विचारला होता, “कृपया शेष जगातल्या अन्नाच्या तुटवड्याबद्दलचे तुमचे मत सांगाल का?”
पाहाणी ठार अयशस्वी झाली, कारण अफ्रिकेत कोणालाच ‘अन्न’ म्हणजे काय ते माहीत नव्हते. पश्चिम युरोपात कोणालाच ‘तुटवडा’ ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. पूर्व युरोप ‘तुमचे मत’ हा शब्दप्रयोग ओळखत नव्हता. दक्षिण अमेरिकेत ‘कृपया’ हा शब्द अनोळखी होता, आणि अमेरिकन संघराज्यात कोणालाच ‘शेष जगा’ची ओळख नव्हती.
[टाईम्स ऑफ इंडिया, १३ मार्च २००१]
स्वयंसिद्ध विधाने आणि परतःसिद्ध विधाने
अमुक विधान स्वयंसिद्ध आहे असे आपण अनेकदा ऐकतो, आणि आपणही म्हणतो. तेव्हा स्वयंसिद्ध विधान म्हणजे काय? आणि अशी काही विधाने आहेत काय? असे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा विचार आहे.
स्वयंसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न होत नाही, आणि ते अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न व्हावे हे आवश्यकही नाही. त्याची सत्यता उघड असते. उलट परतःसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे दुसऱ्या एका किंवा अधिक विधानांपासून निष्पन्न होते. एक विधान दुसऱ्या विधानापासून निष्पन्न होते याचा अर्थ असा की जर दुसरे विधान खरे असेल तर पहिले विधानही अपरिहार्यपणे खरेच असते.
आर्थिक साहाय्यातून साम्राज्यवाद
[AID As IMPERIALISM (१९७१, पेंग्विन) या पुस्तकाचा परामर्श अंजली प्रकाश कुलकर्णी यांनी जाने-मार्च १९९७ च्या ‘अर्थसंवाद’ या नियतकालिकासाठी घेतला. त्या लेखाचा हा संक्षेप]
विदेशी साहाय्य हे उदार अंत:करणाने व निःस्वार्थ बुद्धीने केलेले वित्तीय साधनसंपत्तीचे विनाअटींचे हस्तांतरण होय या कल्पनेला कधीच तिलांजली मिळाली आहे. १९६१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकेचे जगावरील सार्वभौमत्व, दबाव व अंकुश राखण्यासाठी अवलबिलेली ही एक पद्धती असून विदेशी मदतीच्याद्वारे ऋणको देशांना साम्यवादी गटामध्ये समाविष्ट होण्यापासून परावृत्त केले जाते तसेच त्या देशांना अधःपतनापासून वाचविले जाते असे नमूद केले आहे.
क्वाँटम् गतिसिद्धान्ताचा आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक भांडवलदारीवरील परिणाम
[थत्ते स्मृती व्याख्यान मालेमधील सोळावे पुष्प गुंफताना ११ जानेवारी २००१ रोजी नागपुर विद्यापीठात प्रा. पानटानी दिलेल्या व्याख्यानाचा गोषवारा]
मला थत्ते स्मृती व्याख्यान देण्याकरता ट्रस्टचे विश्वस्तांनी जे निमंत्रण दिले त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे. नागपूर विद्यापीठाने भारतास जे विविध पदार्थवैज्ञानिक पुरवले त्यांचे शिल्पकार प्रा. थत्ते असल्याने, हे भाषण देण्यासाठी मला बोलावल्यावर जरा धास्तीच वाटली. तरी पण मी माझे मुक्त विचार आपणास सांगणार आहे.
सर्वप्रथम तंत्रज्ञान म्हणजे काय ह्याचा आपण विचार करू. मनुष्यास निसर्गाचे निरीक्षण करण्यात आनंद मिळतो, तो निखळ असतो. त्यावरून तो काही आडाखे बांधतो, निष्कर्ष काढतो व सिद्धान्त मांडतो.
कामांचा गुणाकार
डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग ही माणसे, त्यांची ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) ही संस्था, हे सगळे महाराष्ट्राच्या ओळखीचे आहे. वैद्यकशास्त्राचे उत्कृष्ट शिक्षण घेऊन ते ज्ञान आदिवासी भागात वापरणारे हे लोक. आपल्या हृद्रोगाचा वैयक्तिक अनुभव वापरून ‘माणसांनी निरामय कसे जगावे’ हे शिकवणारे अभय, झाडांशी स्त्रियांचे नाते आणि ग्रामीण स्त्रियांची स्वतःच्या शारीरिक व्यवहारांकडे पाहायची दृष्टी अशा दोन महत्त्वाच्या संकल्पनांच्या कर्त्या राणी, नुकतेच पन्नाशी उलटलेले हे लोक ‘कर्त्या’ सुधारकांपैकी महत्त्वाचे. त्यांचे काम आणि त्या कामाची इतर जागी ‘लागवड’ करण्याच्या शक्यता, यांच्याविषयी अनौपचारिक गप्पांमधून माहिती मिळवायचा प्रयत्न ‘आजचा सुधारक’ने केला–आपल्या नेहमीचा स्वभाव जरा बाजूला ठेवून!
एक यंत्र आणि स्त्रियांचे काम
कार्यालयीन यंत्रांमुळे सध्याच्या कामांचे स्प जास्त वेगवान, बिनचूक, नियमित आणि कार्यक्षम व्हावे, अशी अपेक्षा होती. टंकलेखक (typewriter) म्हणजे नवा आणि सुधारित कारकून. गणनयंत्र (calculator) म्हणजे नवा आणि सुधारित हिशेबनीस—-जो माणसांची हिशेबाची कामे आ चर्यकारक वेगाने आणि कार्यक्षमतेने, विद्युद्वेगाने करील, असा. आणखी हत्यारे, आणखी अवजारे, आणखी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी. पण जेव्हा टंकलेखक, झेरॉक्स यंत्रे, टेलेफोन स्विचबोर्ड्ज, गणनयंत्रे, संगणक आणि अनेक पंच्ड-कार्ड यंत्रे प्रत्यक्षात कार्यालयांमध्ये अवतरली तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांच्या जागा स्त्रिया आणि यंत्रांची जंजाळे घेऊ लागली. स्त्रियांची बोटे जुन्या ‘हस्तकांच्या’ हातांपेक्षा स्वस्ताईने व नेमकेपणाने कामे करीत.
इतिहास लेखनाची शिस्त
[गजानन भास्कर मेहेंदळे यांचा “श्री राजा शिवछत्रपती (पुणे १९९६)” हा ग्रंथ सच्चा साधनांवर आधारित इतिहास लेखनाचा आदर्श व मानदंड म्हणून गौरवला गेला आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग, विवेकवादी शिस्तीची रूपरेषाच असावा, असा.]
शिवचरित्राच्या अभ्यासाची माझी ही वाटचाल चालू असताना सुस्वातीची दोन-तीन वर्षे मी चुकून भलत्याच वाटेला लागलो होतो. मी तेव्हा जी चूक केली तीच सध्या काही इतिहाससंशोधक, विशेषतः युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करीत असलेले संशोधक, करीत असल्याचे मला आढळून आले आहे. म्हणून, ते वेळीच सावध व्हावेत अशा हेतूने, इथे त्याविषयी थोडक्यात लिहितो.
धर्माची बुद्धिगम्यता
जानेवारीचे संपादकीय महत्त्वाच्या मुद्यांवर प्रतिक्रियांचे आवाहन करते. त्यातले काही मुद्दे धर्माच्या बुद्धिगम्यतेबद्दलचे आहेत. त्यांचे मूळ डिसेंबर २००० च्या अंकातील पाटणकरांच्या अभिप्रायात आणि त्याचेही मूळ सप्टेंबर २००० च्या अंकातील ‘डॉ. दप्तरीचा अभिनव सुखवाद’ या माझ्या लेखात आणि त्याच अंकाच्या संपादकीयात आहे. जिज्ञासू वाचकांच्या सोयीसाठी हे संदर्भ दिले आहेत.
१. डॉ. दप्तरी धर्म बुद्धिगम्य आणि बुद्धिप्रधान मानतात. श्रद्धावादी किंवा शब्दप्रामाण्यवादी समजतात तसा धर्म मानला तर तो तोकडा पडतो असे त्यांचे म्हणणे. मनुष्याच्या आत्यंतिक सुखप्राप्तीसाठी धर्म आहे हा त्यांचा दावा आहे.
२. डॉ. दप्तरी व त्यांचे विरोधक ‘धर्म’ हा शब्द भिन्न अर्थाने वापरतात हे तेथेच स्पष्ट केले आहे.